शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

...तर 'या' दिवशी केजरीवाल सरकारी बंगला रिकामा करतील, सुरक्षाही घेणार नाहीत, संजय सिंहांनी दिली संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:36 IST

AAP MP Sanjay Singh : दिल्लीतील जनता अरविंद केजरीवाल यांना ईमानदार सिद्ध करेल, असे संजय सिंह म्हणाले.

AAP MP Sanjay Singh : नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यामुळं मंगळवारी (दि.१७) दिल्लीची कमान आता आतिशी यांच्या हाती आली आहे. त्यामुळं दिल्लीच्या जनतेला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर अरविंद केजरीवाल सर्व सरकारी सुविधा सोडणार आहेत. आतिशी मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज आपचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. 

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आठवड्याभरात त्यांचा सरकारी बंगला रिकामा करतील. त्यानंतर अरविंद केजरीवाल जनतेच्या दरबारात जाणार आहेत. जनतेत राहून आम्ही जनतेकडून ईमानदार असल्याचे प्रमाणपत्र मागू. मला वाटते की, दिल्लीतील जनता अरविंद केजरीवाल यांना ईमानदार सिद्ध करेल, असे संजय सिंह म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री असताना ज्या सुविधा मिळत होत्या त्याही ते सोडणार आहेत. मात्र, यानंतर त्यांची सुरक्षा धोक्यात येईल. असे अनेक धोकादायक प्रकार त्यांच्याबाबतीत घडले आहेत. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणाले की, देव स्वतः माझे रक्षण करेल, असे संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना कोणता बंगला मिळणार, हे अद्याप ठरलेले नाही. तुमच्या आशीर्वादाने अरविंद केजरीवाल यांना नक्कीच कुठेतरी नवीन ठिकाण मिळेल, असे संजय सिंह म्हणाले. तसेच, खासदार संजय सिंह यांनीही पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजप अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काय करत आहे, हे तुम्ही सर्व पाहत आहात. त्यांच्या ईमानदारीवर हल्ला झाल्याचे ते म्हणाले. 

अरविंद केजरीवाल यांनी प्रामाणिकपणे दिल्लीची सेवा केली, पण त्यांना खोट्या खटल्यात तुरुंगात पाठवण्यात आले. शिक्षणमंत्री असलेले मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद जैन यांना तुरुंगात टाकण्याचे काम केले. याशिवाय, संपूर्ण पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहात. तरीही अरविंद केजरीवाल यांनी धाडसाने उत्तर देण्याचे काम केले, असे संजय सिंह म्हणाले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली