शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

...तर 'या' दिवशी केजरीवाल सरकारी बंगला रिकामा करतील, सुरक्षाही घेणार नाहीत, संजय सिंहांनी दिली संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:36 IST

AAP MP Sanjay Singh : दिल्लीतील जनता अरविंद केजरीवाल यांना ईमानदार सिद्ध करेल, असे संजय सिंह म्हणाले.

AAP MP Sanjay Singh : नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यामुळं मंगळवारी (दि.१७) दिल्लीची कमान आता आतिशी यांच्या हाती आली आहे. त्यामुळं दिल्लीच्या जनतेला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर अरविंद केजरीवाल सर्व सरकारी सुविधा सोडणार आहेत. आतिशी मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज आपचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. 

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आठवड्याभरात त्यांचा सरकारी बंगला रिकामा करतील. त्यानंतर अरविंद केजरीवाल जनतेच्या दरबारात जाणार आहेत. जनतेत राहून आम्ही जनतेकडून ईमानदार असल्याचे प्रमाणपत्र मागू. मला वाटते की, दिल्लीतील जनता अरविंद केजरीवाल यांना ईमानदार सिद्ध करेल, असे संजय सिंह म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री असताना ज्या सुविधा मिळत होत्या त्याही ते सोडणार आहेत. मात्र, यानंतर त्यांची सुरक्षा धोक्यात येईल. असे अनेक धोकादायक प्रकार त्यांच्याबाबतीत घडले आहेत. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणाले की, देव स्वतः माझे रक्षण करेल, असे संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना कोणता बंगला मिळणार, हे अद्याप ठरलेले नाही. तुमच्या आशीर्वादाने अरविंद केजरीवाल यांना नक्कीच कुठेतरी नवीन ठिकाण मिळेल, असे संजय सिंह म्हणाले. तसेच, खासदार संजय सिंह यांनीही पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भाजप अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काय करत आहे, हे तुम्ही सर्व पाहत आहात. त्यांच्या ईमानदारीवर हल्ला झाल्याचे ते म्हणाले. 

अरविंद केजरीवाल यांनी प्रामाणिकपणे दिल्लीची सेवा केली, पण त्यांना खोट्या खटल्यात तुरुंगात पाठवण्यात आले. शिक्षणमंत्री असलेले मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद जैन यांना तुरुंगात टाकण्याचे काम केले. याशिवाय, संपूर्ण पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहात. तरीही अरविंद केजरीवाल यांनी धाडसाने उत्तर देण्याचे काम केले, असे संजय सिंह म्हणाले.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली