शहरं
Join us  
Trending Stories
1
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
2
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
3
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
5
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
6
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
7
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
8
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
9
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
10
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
11
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
12
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
13
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
14
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
15
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
16
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
17
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
18
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
19
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
20
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?

'पंजाबमध्येही 'आप'चा पराभव होऊ शकतो, तसे झाले तर..."; योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:56 IST

आप पक्षाला दिल्लीत मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले. या पराभवानंतर आता पक्षात मोठी फूट होऊ शकते असं बोलले जात आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'चा मोठा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला. दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्षात फूट पडू शकते अशा चर्चा सुरू आहेत. दशकभरापूर्वी भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून जन्मलेल्या या पक्षाला त्यांच्या सर्वात मोठ्या बालेकिल्ल्यात फक्त २२ जागा मिळाल्या आहेत आणि त्यांचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व मोठे चेहरे त्यांच्या जागा वाचवू शकले नाहीत.

दिल्लीतील या पराभवानंतर, पंजाबमध्ये पक्ष फुटण्याचा धोका असल्याची चर्चा सुरू झाली आणि भविष्याबद्दल अनेक अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले योगेंद्र यादव यांनीही ही शंका व्यक्त केली आहे.

राज्यसभेत गदारोळात वक्फवरील जेपीसी अहवाल सादर; खरगे म्हणाले, 'आम्ही असा बनावट अहवाल स्वीकारणार नाही'

एका मुलाखतीदरम्यान योगेंद्र यादव यांनी ही शंका व्यक्त केली आहे. योगेंद्र यादव यांनी पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचा पराभव होण्याची शक्यता व्यक्त केली आणि म्हटले की जर असे झाले तर पक्ष कुठे आणि कसा टिकेल हा एक मोठा प्रश्न आहे. २०१५ मध्ये आम आदमी पक्षातून काढून टाकण्यात आलेले योगेंद्र यादव यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाबद्दल त्यांना असलेल्या शंकांची कारणे देखील सांगितली आहेत.

योगेंद्र यादव म्हणाले, 'ही एक आव्हानात्मक वेळ आहे, यात काही शंका नाही. ज्या पक्षाला ४० टक्क्यांहून अधिक मते आणि २२ आमदार आहेत तो पक्ष स्वतःच कोसळलेला पक्ष नाही. १० वर्षे राज्य केल्यानंतर एकदा निवडणूक हरणे ही तुमच्या पक्षाला तोडणारी गोष्ट नाही. पण आम आदमी पक्ष ज्या प्रकारचा आहे, तो निवडणुकांवर कसा अवलंबून आहे, अरविंद केजरीवालांवर कसा अवलंबून आहे, तो कोणत्या ताकदीने स्पर्धा करत आहे आणि भाजप कोणत्या प्रकारचे काम करेल, यावरून आम आदमी पक्षाच्या भविष्याबद्दल माझ्या मनात प्रश्नचिन्ह आहे, असंही यादव म्हणाले. 

पंजाबमध्येही पराभव होऊ शकतो

योगेंद्र यादव म्हणाले, 'गुजरातमध्ये कोणताही मार्ग नाही, हरयाणामध्ये काहीही झालेले नाही. आता ते पंजाबवर अवलंबून आहे आणि जर आम आदमी पक्ष पंजाबमध्ये हरेल, याची शक्यता आहे. मी भाकीत करत नाही, पण ते हरू शकतात, यात काही शंका नाही. जर पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचा पराभव झाला तर तो कसा आणि कुठे टिकेल हा एक मोठा प्रश्न आहे, असंही यादव म्हणाले. 

"जर आम आदमी पक्ष दिल्लीत जिंकला असता, तर त्यांनी इंडिया आघाडी तोडून तिसरी आघाडी स्थापन केली असती का? यावर ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्यात इंडिया अलायन्स तोडण्याची क्षमता नाही, पण त्यांच्या उपस्थितीमुळे इंडिया अलायन्समध्ये खूप तणाव निर्माण झाला होता. हे देखील खरे आहे की इंडिया अलायन्सची सुरुवात झाल्यापासून केजरीवाल यांचा पक्ष त्यात होते आणि नव्हतेही. ते यायचे पण बोलतही नव्हते. पण ते पंजाबमध्ये वेगळे लढले. योगेंद्र यादव यांनी अरविंद केजरीवाल यांच्या इंडिया आघाडी आणि यमुनेतील विषाबाबतच्या विधानाचा निषेध केला.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवAAPआप