शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
3
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
4
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
5
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
6
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
7
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
8
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
9
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
10
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
11
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
12
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
13
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
14
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार
15
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
16
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
17
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
18
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
19
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
20
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?

'पंजाबमध्येही 'आप'चा पराभव होऊ शकतो, तसे झाले तर..."; योगेंद्र यादव यांनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 13:56 IST

आप पक्षाला दिल्लीत मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले. या पराभवानंतर आता पक्षात मोठी फूट होऊ शकते असं बोलले जात आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'चा मोठा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला. दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्षात फूट पडू शकते अशा चर्चा सुरू आहेत. दशकभरापूर्वी भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून जन्मलेल्या या पक्षाला त्यांच्या सर्वात मोठ्या बालेकिल्ल्यात फक्त २२ जागा मिळाल्या आहेत आणि त्यांचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व मोठे चेहरे त्यांच्या जागा वाचवू शकले नाहीत.

दिल्लीतील या पराभवानंतर, पंजाबमध्ये पक्ष फुटण्याचा धोका असल्याची चर्चा सुरू झाली आणि भविष्याबद्दल अनेक अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले योगेंद्र यादव यांनीही ही शंका व्यक्त केली आहे.

राज्यसभेत गदारोळात वक्फवरील जेपीसी अहवाल सादर; खरगे म्हणाले, 'आम्ही असा बनावट अहवाल स्वीकारणार नाही'

एका मुलाखतीदरम्यान योगेंद्र यादव यांनी ही शंका व्यक्त केली आहे. योगेंद्र यादव यांनी पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचा पराभव होण्याची शक्यता व्यक्त केली आणि म्हटले की जर असे झाले तर पक्ष कुठे आणि कसा टिकेल हा एक मोठा प्रश्न आहे. २०१५ मध्ये आम आदमी पक्षातून काढून टाकण्यात आलेले योगेंद्र यादव यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाबद्दल त्यांना असलेल्या शंकांची कारणे देखील सांगितली आहेत.

योगेंद्र यादव म्हणाले, 'ही एक आव्हानात्मक वेळ आहे, यात काही शंका नाही. ज्या पक्षाला ४० टक्क्यांहून अधिक मते आणि २२ आमदार आहेत तो पक्ष स्वतःच कोसळलेला पक्ष नाही. १० वर्षे राज्य केल्यानंतर एकदा निवडणूक हरणे ही तुमच्या पक्षाला तोडणारी गोष्ट नाही. पण आम आदमी पक्ष ज्या प्रकारचा आहे, तो निवडणुकांवर कसा अवलंबून आहे, अरविंद केजरीवालांवर कसा अवलंबून आहे, तो कोणत्या ताकदीने स्पर्धा करत आहे आणि भाजप कोणत्या प्रकारचे काम करेल, यावरून आम आदमी पक्षाच्या भविष्याबद्दल माझ्या मनात प्रश्नचिन्ह आहे, असंही यादव म्हणाले. 

पंजाबमध्येही पराभव होऊ शकतो

योगेंद्र यादव म्हणाले, 'गुजरातमध्ये कोणताही मार्ग नाही, हरयाणामध्ये काहीही झालेले नाही. आता ते पंजाबवर अवलंबून आहे आणि जर आम आदमी पक्ष पंजाबमध्ये हरेल, याची शक्यता आहे. मी भाकीत करत नाही, पण ते हरू शकतात, यात काही शंका नाही. जर पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचा पराभव झाला तर तो कसा आणि कुठे टिकेल हा एक मोठा प्रश्न आहे, असंही यादव म्हणाले. 

"जर आम आदमी पक्ष दिल्लीत जिंकला असता, तर त्यांनी इंडिया आघाडी तोडून तिसरी आघाडी स्थापन केली असती का? यावर ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्यात इंडिया अलायन्स तोडण्याची क्षमता नाही, पण त्यांच्या उपस्थितीमुळे इंडिया अलायन्समध्ये खूप तणाव निर्माण झाला होता. हे देखील खरे आहे की इंडिया अलायन्सची सुरुवात झाल्यापासून केजरीवाल यांचा पक्ष त्यात होते आणि नव्हतेही. ते यायचे पण बोलतही नव्हते. पण ते पंजाबमध्ये वेगळे लढले. योगेंद्र यादव यांनी अरविंद केजरीवाल यांच्या इंडिया आघाडी आणि यमुनेतील विषाबाबतच्या विधानाचा निषेध केला.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवAAPआप