शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’वाद झाला अधिकृत

By admin | Updated: March 10, 2015 23:43 IST

आम आदमी पार्टीतील अंतर्गत मतभेद विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्यासह

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील अंतर्गत मतभेद विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्यासह पक्षाचा पराभव व्हावा यासाठीच भूषण पिता- पुत्र (शांती भूषण- प्रशांत भूषण) व योगेंद्र यादव काम करीत होते, असा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे. त्यांचे पहिले अधिकृत निवेदन मंगळवारी जारी केले.आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने प्रशांत भूषण व यादव यांची पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून (पीएसी) हकालपट्टी केल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, वाहतूक मंत्री गोपाल राय, सरचिटणीस पंकज गुप्ता आणि संजय सिंग यांनी या निर्णयाचे समर्थन केले.‘‘या तिघांनी, विशेषत: प्रशांत भूषण यांनी बाहेरील राज्यांतून प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी मी पक्षाचा प्रचार करणार नाही, तुम्हीही करू नका. पराभव झाला तरच केजरीवालांना थोडी समज येईल, असे धक्कादायक विधान केले होते. पक्षाला कुणी निधी देत असेल तर तोही थांबवावा,’’ असे भूषण यांनी आपच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया यांच्या व म्हैसूरच्या कार्यकर्त्यांसमक्ष म्हटल्याचा उल्लेख सिसोदिया व इतरांनी निवेदनात केला.या तिघांची पक्षाच्या राष्ट्रीय संयोजक पदावरून केजरीवाल यांना हटविण्याची इच्छा होती. निवडणुकीच्या दोन आठवडे आधी आशिष खेतान यांनी प्रशांत भूषण यांना फोन करून दिल्लीतील चर्चा प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केला असता प्रशांत भूषण यांनी पक्ष पराभूत व्हावा, केवळ २० ते २२ जागा मिळाल्यास केजरीवालांना समज येईल असे विधान केले होते. भाजपने जोरदार प्रचार चालविला असता आपचे ज्येष्ठ नेते या तिघांची समजूत घालण्यात अमूल्य वेळ वाया घालवत होते, अशी माहिती या निवेदनात दिली आहे. यादव यांनी काही ध्वनिमुद्रित माहिती देऊन केजरीवालांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न केला. शांती भूषण यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांना केवळ समर्थनच दिले नाही, तर आपमधून बाहेर पडलेल्या स्वयंसेवी विचार मंचालाही उघड उघड पाठिंबा दिला. मतदानाच्या काही दिवस आधी शांती भूषण यांनी केजरीवालांपेक्षा बेदी अधिक विश्वसनीय असल्याचे विधान केले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्याबाबत विचारणा चालविली होती. शांती भूषण यांनी केजरीवालविरोधी विधानांचा सपाटाच लावला होता, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले आहे. पीएसीमधून वगळण्याचा निर्णय बेजबाबदार आणि लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप या तिघांनी केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)