शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

अरविंद केजरीवालांची तिरकी चाल! आम आदमी पक्ष बिहार विधानसभा लढणार; INDIA आघाडीत बिघाडी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 09:51 IST

बिहारमधील गलिच्छ राजकारणामुळे राज्य मागे पडले, अशी टीका आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे.

INDIA VS NDA: इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. २६ विरोधी पक्ष मुंबईतील बैठकीत सहभागी होणार आहेत. भाजपला चितपट करण्यासाठी विरोधक रणनीति आखत असतानाच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, यामुळे आता इंडिया आघाडीत बिघाडी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

लोकसभा निवडणुकांसाठी एनडीए आणि विरोधकांची इंडिया आघाडी जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी एकवटलेल्या इंडिया आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. आम आदमी पक्षाने बिहार विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीत कितपद ऐकी राहील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका लढण्याची घोषणा 

आम आदमी पक्षाने बिहारमध्ये विधानसभा निवडणुका लढण्याची घोषणा केली. बिहारमध्ये २०२५ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आपचे प्रमुख सचिव संदीप पाठक यांनी बिहारमधील नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक घेतली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीवेळी, संदीप पाठक यांनी बिहारमध्ये 'आप'ला मजबूत करण्यावर भर दिला. आपचे बिहारमधील प्रमुख अजिश यादव हेही उपस्थित होते.

गलिच्छ राजकारणामुळे राज्य मागे पडले 

बिहारमधील गलिच्छ राजकारणामुळे राज्य मागे पडले आहे, अशी टीका करताना, बिहारमध्ये आम्ही विधानसभा लढणार आहोत. पण, निवडणुका लढण्याआधी संघटना मजबूत असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. गुजरातमध्ये लढल्याप्रमाणे बिहारमध्येही पूर्ण शक्तीने आम्ही निवडणूक लढवू. त्याआधी पक्ष स्थानिक निवडणुका लढवेल, अशी माहिती पाठक यांनी दिली. 

 

टॅग्स :BiharबिहारAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल