शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याचे प्रतीक, आंदाेलनाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 11:54 IST

‘श्री राम मंदिर : एका दिव्य स्वप्नाची पूर्तता’ असा एक लेख लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, बेगडी धर्मनिरपेक्षता व खरी धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये असलेल्या फरकाबाबत राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली.

नवी दिल्ली : अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणे, हा मुख्य उद्देश असलेले रामजन्मभूमी आंदोलन त्यानंतर बेगडी धर्मनिरपेक्षतेच्या घातक आक्रमणाचा सामना करत धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक बनले, असे माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले आहे.‘श्री राम मंदिर : एका दिव्य स्वप्नाची पूर्तता’ असा एक लेख लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, बेगडी धर्मनिरपेक्षता व खरी धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये असलेल्या फरकाबाबत राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली.

या आंदोलनाला समाजाच्या तळागाळातून मोठा पाठिंबा मिळत होता. दुसऱ्या बाजूला विशिष्ट समुदायाची मते आपल्याला मिळणार नाहीत, या भीतीमुळे बहुतांश राजकीय पक्ष राम जन्मभूमी आंदोलनाचे समर्थन करण्यास कचरत होते. मतपेढीच्या राजकारणाला शरण जाऊन या पक्षांनी वर्तनाचे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली समर्थन सुरू केले.

१९९०मध्ये सोमनाथ ते अयोध्येपर्यंत लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राम रथयात्रा काढण्यात आली होती. रथयात्रा काढून आंदाेलनाला राजकीय मुद्दा बनविले. या आंदाेलनमुळे भाजपची ताकत वाढली. अडवाणी हे सक्रिय राजकारणापासून लांब आहेत. त्यावेळी सर्व घटनांचा संदर्भ देऊन लालकृष्ण अडवाणी (वय ९६) यांनी सांगितले की, रथयात्रेच्या रुपाने नियतीनेच कर्तव्य पार पाडण्याची मला संधी दिली हाेती. 

अटलजी, पत्नी कमला यांची आठवणलालकृष्ण अडवाणी म्हणाले की, अयोध्येत राम जन्मभूमीवर राममंदिर बांधण्याचे स्वप्न साकार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विश्व हिंदू परिषद, रा. स्व. संघ, भाजप तसेच रामरथयात्रेत सहभागी झालेले हजारो लोक, संतमहंत, कारसेवक, नेते यांचा मी आभारी आहे. मात्र, अयोध्येत राममंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मला पत्नी कमला व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण येते. ते आज हे पाहण्यासाठी हवे होते.

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या