शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

लवकरच चित्त्यांची नवी खेप येणार; मध्य प्रदेश अन् राजस्थानच्या अभयारण्यात ठेवले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 21:47 IST

ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत केनियातील चित्ते भारतात दाखल होतील.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांशी चित्ता प्रकल्पाला सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. चित्त्यांच्या मृत्यूमुळे या प्रकल्पाचे पुढे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण, आता परिस्थिती सुधारली आहे. चित्त्यांच्या मृत्यूचे सत्र थांबले असून, त्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळेच आता या प्रकल्पांतर्गत आफ्रिकन देशांतून चित्त्यांची नवी खेप आणण्याची तयारी सुरू झाली आहे. या वर्षाच्या अखेरीस, म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत आणखी काही चित्ते भारतात येतील. 

आतापर्यंत 20 चित्ते भारतात आले चित्ता प्रकल्प 2022 मध्ये सुरू झाला, त्याअंतर्गत येत्या पाच वर्षांत एकूण 50 बिबट्या आणले जाणार आहेत. यातील आठ चित्ते 2022 मध्ये नामिबियातून आणण्यात आले होते, तर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले. आतापर्यंत एकूण 20 चित्ते भारतात आले, त्यापैकी सात चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या 13 चित्ते भारतात असून, त्यातील काहींनी पिलांनाही जन्म दिला आहे. या सर्वांनी भारतीय वातावरणाशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसह इतर वन्यजीव तज्ञही आनंदीत आहेत.

आता केनियाहून चित्ते येणारसध्या कुनोमध्ये चित्त्यांची एकूण संख्या 27 आहे, ज्यात 13 प्रौढ आणि 14 शावकांचा समावेश आहे. यातील सुमारे सहा शावकं एक वर्षाची होणार आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही वन्यजीवांचे पुनर्वसन किंवा विकास होण्यासाठी त्यांची संख्या शंभरच्या आसपास असावी. मिळालेल्या माहितीनुसार, आता केनियाहून चित्ते आणले जाणार आहे. केनियाचे हवामान काहीसे भारतीय वन्यजीव अभयारण्यांसारखे आहे. 

मध्य प्रदेश-राजस्थानच्या अभयारण्यांमध्ये चित्ते ठेवले जाणारसध्या मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात चित्ते ठेवले आहेत. पण, कुनोची एकूण 25-30 बिबट्या ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे आता नवीन चित्ते दुसऱ्या कुठल्यातरी अभयारण्यात ठेवली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, चित्त्यांची नवीन खेप मध्य प्रदेशातील नोरादेही आणि गांधी सागर किंवा राजस्थानमधील भैंसरोदगड येथे ठेवली जाऊ शकतात. याचे कारण म्हणजे, कुनोमध्ये ठेवलेले चित्ते राजस्थानला लागून असलेल्या अभयारण्यातही फिरत आहेत.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थानNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार