शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दिल्लीत मोठी व्हीआयपी मुव्हमेंट! 7 सप्टेंबर, मध्यरात्री १२ वाजल्यापासून वाहतूक बंद करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 09:51 IST

ट्रॅफिकवरून दिल्लीच्या लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. कोणते रस्ते खुले असतील, लोक ये-जा करू शकणार की नाही, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत.

लॉकडाऊनंतर पहिल्यांदाच नवी दिल्लीची चाके तीन दिवसांसाठी थांबणार आहेत. सात सप्टेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यापासून नवी दिल्लीतील वाहतूक बंद केली जाणार आहे. यासाठी शाळा, कार्यालये आदी बंद ठेवण्यात येणार आहेत. दिल्लीत जी-२० शिखर परिषद होणार आहे. यासाठी ८, ९ आणि १० सप्टेंबरला दिल्लीतील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. 

ट्रॅफिकवरून दिल्लीच्या लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. कोणते रस्ते खुले असतील, लोक ये-जा करू शकणार की नाही, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. वाहतुक पोलिसांनुसार लोकांच्या प्रवासावर तेवढा प्रभाव पडणार नाही. कारण शाळा, कॉलेज आणि कार्यालये या तीन दिवस बंद ठेवली जाणार आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ही सुट्टी असणार आहे. नवी दिल्ली वगळता इतर ठिकाणी वाहतुकीची समस्या नसणार आहे. 

व्हीआयपी ये-जा करत असताना वाहतूक वळविली जाईल. इतर ठिकाणी सर्व रस्ते बंद ठेवले जाणार नाहीत. यामुळे लोक पर्यायी मार्गाद्वारे वाहतूक करू शकणार आहेत. G-20 शिखर परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थापन आराखड्यानुसार, 7 तारखेच्या मध्यरात्री 12 पासून, नवी दिल्ली परिसर आणि इतर प्रतिबंधित किंवा सुरक्षा घेरलेल्या ठिकाणांभोवती वाहतूक नियम लागू केले जातील. 

या तीन दिवसांत दिल्लीच्या सीमांवरून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, रेशनच्या वस्तू, औषधे आणि पेट्रोलियम पदार्थ इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकनाच प्रवेश दिला जाईल. तसेच जी वाहने दिल्लीच्या आत आहेत त्यांना दिल्लीबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. नवी दिल्ली परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हीआयपी मुव्हमेंट होणार असून, या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील सर्व कार्यालये, मॉल्स आणि बाजारपेठा 8 ते 10 तारखेपर्यंत बंद राहतील. 

गाझीपूर, सराय काले खान आणि आनंद विहार येथेही आंतरराज्यीय बसेस थांबविल्या जाणार आहेत. गुडगावकडून येणाऱ्या हरियाणा आणि राजस्थानच्या आंतरराज्यीय बसेसही राजोकरी सीमेवर थांबवल्या जातील किंवा तेथून मेहरौलीच्या दिशेने पाठवल्या जातील. फक्त मेट्रो सेवा सुरू राहणार आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीTrafficवाहतूक कोंडी