शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

दिल्लीत मोठी व्हीआयपी मुव्हमेंट! 7 सप्टेंबर, मध्यरात्री १२ वाजल्यापासून वाहतूक बंद करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 09:51 IST

ट्रॅफिकवरून दिल्लीच्या लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. कोणते रस्ते खुले असतील, लोक ये-जा करू शकणार की नाही, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत.

लॉकडाऊनंतर पहिल्यांदाच नवी दिल्लीची चाके तीन दिवसांसाठी थांबणार आहेत. सात सप्टेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यापासून नवी दिल्लीतील वाहतूक बंद केली जाणार आहे. यासाठी शाळा, कार्यालये आदी बंद ठेवण्यात येणार आहेत. दिल्लीत जी-२० शिखर परिषद होणार आहे. यासाठी ८, ९ आणि १० सप्टेंबरला दिल्लीतील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. 

ट्रॅफिकवरून दिल्लीच्या लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. कोणते रस्ते खुले असतील, लोक ये-जा करू शकणार की नाही, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. वाहतुक पोलिसांनुसार लोकांच्या प्रवासावर तेवढा प्रभाव पडणार नाही. कारण शाळा, कॉलेज आणि कार्यालये या तीन दिवस बंद ठेवली जाणार आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ही सुट्टी असणार आहे. नवी दिल्ली वगळता इतर ठिकाणी वाहतुकीची समस्या नसणार आहे. 

व्हीआयपी ये-जा करत असताना वाहतूक वळविली जाईल. इतर ठिकाणी सर्व रस्ते बंद ठेवले जाणार नाहीत. यामुळे लोक पर्यायी मार्गाद्वारे वाहतूक करू शकणार आहेत. G-20 शिखर परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थापन आराखड्यानुसार, 7 तारखेच्या मध्यरात्री 12 पासून, नवी दिल्ली परिसर आणि इतर प्रतिबंधित किंवा सुरक्षा घेरलेल्या ठिकाणांभोवती वाहतूक नियम लागू केले जातील. 

या तीन दिवसांत दिल्लीच्या सीमांवरून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, रेशनच्या वस्तू, औषधे आणि पेट्रोलियम पदार्थ इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकनाच प्रवेश दिला जाईल. तसेच जी वाहने दिल्लीच्या आत आहेत त्यांना दिल्लीबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. नवी दिल्ली परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हीआयपी मुव्हमेंट होणार असून, या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील सर्व कार्यालये, मॉल्स आणि बाजारपेठा 8 ते 10 तारखेपर्यंत बंद राहतील. 

गाझीपूर, सराय काले खान आणि आनंद विहार येथेही आंतरराज्यीय बसेस थांबविल्या जाणार आहेत. गुडगावकडून येणाऱ्या हरियाणा आणि राजस्थानच्या आंतरराज्यीय बसेसही राजोकरी सीमेवर थांबवल्या जातील किंवा तेथून मेहरौलीच्या दिशेने पाठवल्या जातील. फक्त मेट्रो सेवा सुरू राहणार आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीTrafficवाहतूक कोंडी