शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

९९ कलंकित उमेदवार

By admin | Updated: September 29, 2015 23:18 IST

बिहारमध्ये बंदूक आणि गुंडशाहीच्या बळावर निवडणुका लढण्याची परंपरा दशकानुदशके चालत आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनी आजवर महत्त्वाची भूमिका वठवली आहे

पाटणा : बिहारमध्ये बंदूक आणि गुंडशाहीच्या बळावर निवडणुका लढण्याची परंपरा दशकानुदशके चालत आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनी आजवर महत्त्वाची भूमिका वठवली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीतही बंदुकीच्या खटक्यावर बोट ठेवणारे बाहुबलीं पुन्हा एकदा सरसावलेले दिसतील. पूर्वाश्रमीच्या अनेक गुंडांनी थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश मिळविला आहे. यावेळी ९९ कलंकित उमेदवार निवडणूक रिंगणात भवितव्य अजमावत आहेत.काहींनी पत्नी आणि नातेवाईकांना तिकिटे मिळवून दिली आहेत. काही जण प्रत्यक्ष निवडणुकीत उतरणार नसले तरी उमेदवारांच्या भवितव्यावर त्यांचा चांगलाच प्रभाव राहील, असे संकेत मिळाले आहेत. निवडणूक लढण्यासाठी धनशक्ती आणि मनगटी शक्तीची गरजच त्यातून अधोरेखित होत आहे. निवडणूक आयोगाने राजकीय यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न चालविले असले तरी पक्षांनी निवडणूक जिंकायचीच हा उद्देश ठेवून राजकीय शुचितेला बगल दिलेली आढळते. (वृत्तसंस्था)--------यावेळी गुन्हेगारी आरोप असलेले ९९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत डेमॉक्रॅटिक रिफॉर्म या स्वयंसेवी संस्थेने १४१ कलंकित उमेदवारांची ओळख पटविली होती. गेल्या पाच वर्षांत त्यापैकी काही जण निर्दोष सुटले. काही सध्या हयात नाहीत. पण बाहुबलींचा वरचष्मा कायम आहे. भाजप आणि जेडीयूने एकत्रितरीत्या सात डझनावर (८४) कलंकित उमेदवारांना तिकिटे दिली आहेत. राजदने सहा तर जीतनराम मांझी यांच्या हम आणि काँग्रेसने प्रत्येकी तीन, लोजपाने एका कलंकित उमेदवाराला स्थान दिले आहे. ३० उमेदवारांवर खून, अपहरण, खंडणीवसुली आणि लुटमारीसारखे गंभीर आरोप आहेत.त्यातील १७ उमेदवार महायुतीकडे तर १३ उमेदवार रालोआकडे आहेत.