शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"१८ कोटी खर्चून बांधला हा अद्भुत नमुना"; भोपळमध्ये ९० अंशाचे वळण असलेल्या पुलावरुन नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:16 IST

भोपाळमध्ये बनलेल्या या नव्या पुलामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

Bhopal Railway Overbridge: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एका पुलाची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. भोपाळच्या ऐशबाग स्टेडियमजवळ एक नवीन रेल्वे ओव्हरब्रिज जवळपास तयार झाला आहे. मात्र आता तो सुरु होण्यापूर्वीच वाद सुरू झाला आहे. हा वाद काम वेळेवर पूर्ण न होण्याबद्दल किंवा खर्च वाढण्याबद्दल नाही तर त्याच्या डिझाइनबद्दल आहे. ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि १८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलावरील धोकादायक ९० अंशाच्या वळणाने लोकांना धक्का बसला आहे. या पुलाचे ९० अंशाचे वळण अपघातांचे मोठे कारण बनू शकते असं लोकांचे म्हणणं आहे. मात्र यावर सरकारकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

भोपाळमध्ये बांधलेला हा ऐशबाग रेल्वे ओव्हरब्रिज धोकादायक वळणामुळे उद्घाटनापूर्वीच वादात सापडला आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित करत ९० अंशांच्या वळणामुळे भविष्यात मोठे अपघात होऊ शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली. लोकांनी पुलाच्या डिझाइनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाहनचालकांना अचानक ९० अंशांवर वाहन वळवण्यात अडचणी येऊ शकतात असं लोकांचे म्हणणं आहे. नेटकऱ्यांनी या पुलाच्या कामावरुन सरकारवर टीका केलीय.

"भोपाळचा हा ऐशबाग रेल्वे ओव्हर ब्रिज, जो पीडब्ल्यूडीने १० वर्षांत बांधला आहे, तो एका चमत्कारासारखा आहे. हा पूल केवळ वाहतूक कोंडीचे एक नवीन केंद्र बनणार नाही तर हे वळण एका मोठ्या अपघातालाही आमंत्रण देईल. ज्यांना दररोज हा पूल ओलांडावा लागेल त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. कारण हा पूल बनवणाऱ्यांनी फक्त औपचारिकता पूर्ण केल्या आहेत, जबाबदारी नाही, असं मनिष चौधरी नावाच्या युजरने म्हटलं. दुसऱ्या एका युजरने, ठ९० अंश कोनातून मृत्यू येईल. विकासाचा हा कोन मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये उदयास आला आहे. यासाठी १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले, असं म्हटलं. आणखी एका युजरने कडक सूचना, ही तंत्रज्ञान देशाबाहेर जायला नको. हा अद्भुत नमुना १८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे, असा टोमणा लगावला.

दरम्यान, यासंदर्भात पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह यांना पुलाच्या डिझाइनबद्दल प्रश्न विचारला होता. "पुलाच्या बांधकामानंतर अचानक काही तज्ञ पुढे आले आहेत आणि त्यांनी बोलणे सुरू केले आहे. तर कोणताही पूल बांधताना अनेक तांत्रिक बाबी विचारात घेतल्या जातात.जर असे आरोप झाले तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल," असं मंत्री राकेश सिंह म्हणाले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश