शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

माझा मृत्यू ९ वर्षांपूर्वी झालाय! ४ वर्षांच्या मुलीचा दावा; पुनर्जन्माची कहाणी ऐकून कुटुंब हादरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 10:38 IST

९ वर्षांपूर्वी माझा जळून मृत्यू झाला; ४ वर्षांच्या मुलीचा दावा; पुनर्जन्माची कहाणी ऐकून गाव थक्क

जयपूर: राजस्थानमधल्या नाथद्वारा येथील परावल गावात वास्तव्यास असलेल्या एका ४ वर्षीय मुलीनं केलेले दावे ऐकून तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. ४ वर्षांची किंजल वारंवार भावाला भेटण्यासाठी हट्ट करायची. एके दिवशी तिच्या आईनं वडिलांना बोलावण्यास सांगितलं. त्यावर वडील पिपलांत्री गावात असल्याचं किंजल म्हणाली. पिपलांत्री गावात ९ वर्षांपूर्वी उषा नावाच्या महिलेचा जळून मृत्यू झाला. पिपलांत्री गाव परावलपासून ३० किलोमीटरवर आहे.

वडील पिपलांत्री गावात असल्याचं किंजलनं सांगताच कुटुंबाला धक्का बसला. याबद्दल किंजलची आई दुर्गा यांनी अधिक विचारणा केली. त्यावर पिपलांत्री गावात आपलं कुटुंब राहतं. तिथे आई, वडील, भाऊ वास्तव्याला असतात, असं किंजलनं सांगितलं. ९ वर्षांपूर्वी एका दुर्घटनेत माझा मृत्यू झाला. मी भाजले होते, असंही किंजलनं पुढे सांगितलं. त्यानंतर दुर्गा आणि तिच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली.

किंजलनं सांगितलेला संपूर्ण घटनाक्रम दुर्गा यांनी पती रतन सिंह यांच्याकडे कथन केला. रतन सिंह किंजलला डॉक्टरांकडे घेऊन गेले. मात्र तिची प्रकृती सामान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. किंजल सातत्यानं तिच्या कुटुंबाला भेटण्या हट्ट करू लागली. माझं माहेर पिपलांत्रीमध्ये आहे, सासर ओडनमध्ये असल्याचं तिनं सांगितलं.

किंजलची गोष्ट पिपलांत्रीत वास्तव्यास असलेल्या पंकजपर्यंत पोहोचली. त्यानं तातडीनं परावल गाठलं. पंकज उषाचा भाऊ आहे. पंकजला पाहताच किंजलच्या आनंदाला पारावार उरला नाही. पंकजनं त्याच्या मोबाईलमध्ये असलेला त्याच्या आईचा आणि उषाचा फोटो दाखवला. तो पाहून किंजल खूप रडली. १४ जानेवारीला किंजल तिच्या कुटुंबासह पिपलांत्रीला पोहोचली.

किंजल गावात अशा प्रकारे वावरत होती, जणू काही वर्षानुवर्षांपासून ती तिथेच राहते. ज्या महिलांशी उषा संवाद साधायची, त्याच महिलांची किंजलनं विचारपूस केली. उषाची आई गीता यांना हे दृश्य पाहून अश्रू अनावर झाले. २०१३ मध्ये उषाचा मृत्यू झाला. स्वयंपाकघरात काम करत असताना ती भाजली. त्यात उषाचा मृत्यू झाला. उषाला दोन मुलं आहेत.