शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

हृदयद्रावक! वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत मुखाग्नी दिला; 9 मुलींनी पार पाडलं कर्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 15:21 IST

वडिलांच्या निधनानंतर 9 मुलींनी मुलाचं कर्तव्य पार पाडत मुखाग्नी दिला. हे दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले.

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वडिलांच्या निधनानंतर 9 मुलींनी मुलाचं कर्तव्य पार पाडत मुखाग्नी दिला. हे दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले. या मुलींनी फक्त अंत्यसंस्कारच केले नाहीत, तर वडिलांच्या पार्थिवाला खांदा देखील दिला. स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार केले. हे दृश्य पाहून काही लोक रडायला लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस एएसआय हरिश्चंद्र अहिरवार हे वॉर्ड क्रमांक 17 मधील 10व्या बटालियन भागातील रहिवासी होते. ब्रेन हॅमरेजमुळे सोमवारी त्यांचं निधन झालं. हरिश्चंद्र यांना नऊ मुली आहेत. मुलगा नाही. हरिश्चंद्र यांनी मुलाप्रमाणेच आपल्या सर्व मुलींना वाढवलं. 7 मुलींचं लग्न केलं. आता त्याच मुलींनी मुलाचं कर्तव्य पार पाडलं.

मुलींनी वडिलांना खांदा दिला आणि इतर विधी पार पाडले. 7 मुली विवाहित आहेत तर मुली रोशनी आणि गुडिया अविवाहित आहेत. मुलगी वंदनाने सांगितले की, वडिलांचं मुलींवर खूप प्रेम होतं. आम्हाला एकही भाऊ नाही, त्यामुळे सर्व लहान आणि मोठ्या बहिणींनी (अनिता, तारा, जयश्री, कल्पना, रिंकी, गुडिया, रोशनी आणि दुर्गा) मिळून मुलाचं कर्तव्य पार पाडायचं ठरवलं. 

आमचे वडीलच आमच्यासाठी सर्वकाही होते असं देखील मुलींनी म्हटलं आहे. बुंदेलखंडमध्ये मुली आणि महिलांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे. पण आता समाजातील जुन्या परंपरा आणि समजुती मोडून लोक पुढाकार घेत असलेलं पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे मुलींनी वडिलांवर अंत्यसंस्कार केले असून नवा आदर्श निर्माण केला आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश