शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची घंटा! २०३० पर्यंत तब्बल ९ कोटी भारतीयांवर उपासमारीचं संकट; चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 09:48 IST

हवामानातील बदलांचे परिणाम दिसून येणार; भारतासमोर मोठं संकट

मुंबई: वातावरणातील बदलांचे भीषण परिणाम भविष्यात दिसून येणार आहेत. देशातील ९ कोटी नागरिकांवर उपासमारीचं संकट कोसळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेनं आपल्या अहवालातून धोक्याचा इशारा दिला आहे. २०३० पर्यंत ९ कोटी भारतीयांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असं आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेनं अहवालात म्हटलं आहे. 

येणाऱ्या ७०-८० वर्षांत धान्यांचं उत्पादन कमी होईल. उष्णतेच्या लाटांचं प्रमाण कैकपटीनं वाढेल, असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. वातावरणातील बदलांमुळे २०३० पर्यंत देशातील ९ कोटींहून अधिक लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल. सर्वसामान्य परिस्थितीत हा आकजा ७.३९ कोटी असता, पण वातावरणातील बदलांमुळे हा आकडा २३ टक्क्यांनी वाढेल, अशी आकडेवारी अहवालात आहे.

२०३० पर्यंत कॅलरी ग्रहण करण्याचं प्रमाण होईल. सामान्य परिस्थितीत एक व्यक्ती दिवसाकाठी २ हजार ६९७ कॅलरी ग्रहण करतो. वातावरणातील बदलांमुळे हाच आकडा २ हजार ६५१ वर येईल. वातावरणातील उत्पादनाचा परिणाम खाद्य उत्पादनावरही होईल. धान्य, फळं, भाज्या, तेलबिया, डाळी, मांस यांचं उत्पादन कमी होईल. २१०० पर्यंत देशाचं तापमान २.४ अंश सेल्सिअस ते ४.४ अंश सेल्सिअसनं वाढेल. उष्णतेच्या लाटांचं प्रमाण तिप्पट ते चौपट होईल.

तापमान वाढीचा परिणाम धान्यांच्या उत्पादनावर होईल. २०४१ ते २०६० च्या दरम्यान उत्पादन १.८ ते ६.६ टक्क्यांनी घसरेल. २०६१ ते २०८० च्या दरम्यान धान्य उत्पादनात ७.२ ते २३.६ टक्क्यांची घट होईल. हरित वायूंचं उत्सर्जन कमी करण्यासाठी वायव्य भारतात तांदळाऐवजी इतर धान्यांचं उत्पादन घेण्यात यावं असा सल्ला देण्यात आला आहे.