शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

धोक्याची घंटा! २०३० पर्यंत तब्बल ९ कोटी भारतीयांवर उपासमारीचं संकट; चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 09:48 IST

हवामानातील बदलांचे परिणाम दिसून येणार; भारतासमोर मोठं संकट

मुंबई: वातावरणातील बदलांचे भीषण परिणाम भविष्यात दिसून येणार आहेत. देशातील ९ कोटी नागरिकांवर उपासमारीचं संकट कोसळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेनं आपल्या अहवालातून धोक्याचा इशारा दिला आहे. २०३० पर्यंत ९ कोटी भारतीयांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असं आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेनं अहवालात म्हटलं आहे. 

येणाऱ्या ७०-८० वर्षांत धान्यांचं उत्पादन कमी होईल. उष्णतेच्या लाटांचं प्रमाण कैकपटीनं वाढेल, असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. वातावरणातील बदलांमुळे २०३० पर्यंत देशातील ९ कोटींहून अधिक लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल. सर्वसामान्य परिस्थितीत हा आकजा ७.३९ कोटी असता, पण वातावरणातील बदलांमुळे हा आकडा २३ टक्क्यांनी वाढेल, अशी आकडेवारी अहवालात आहे.

२०३० पर्यंत कॅलरी ग्रहण करण्याचं प्रमाण होईल. सामान्य परिस्थितीत एक व्यक्ती दिवसाकाठी २ हजार ६९७ कॅलरी ग्रहण करतो. वातावरणातील बदलांमुळे हाच आकडा २ हजार ६५१ वर येईल. वातावरणातील उत्पादनाचा परिणाम खाद्य उत्पादनावरही होईल. धान्य, फळं, भाज्या, तेलबिया, डाळी, मांस यांचं उत्पादन कमी होईल. २१०० पर्यंत देशाचं तापमान २.४ अंश सेल्सिअस ते ४.४ अंश सेल्सिअसनं वाढेल. उष्णतेच्या लाटांचं प्रमाण तिप्पट ते चौपट होईल.

तापमान वाढीचा परिणाम धान्यांच्या उत्पादनावर होईल. २०४१ ते २०६० च्या दरम्यान उत्पादन १.८ ते ६.६ टक्क्यांनी घसरेल. २०६१ ते २०८० च्या दरम्यान धान्य उत्पादनात ७.२ ते २३.६ टक्क्यांची घट होईल. हरित वायूंचं उत्सर्जन कमी करण्यासाठी वायव्य भारतात तांदळाऐवजी इतर धान्यांचं उत्पादन घेण्यात यावं असा सल्ला देण्यात आला आहे.