शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

धोक्याची घंटा! २०३० पर्यंत तब्बल ९ कोटी भारतीयांवर उपासमारीचं संकट; चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 09:48 IST

हवामानातील बदलांचे परिणाम दिसून येणार; भारतासमोर मोठं संकट

मुंबई: वातावरणातील बदलांचे भीषण परिणाम भविष्यात दिसून येणार आहेत. देशातील ९ कोटी नागरिकांवर उपासमारीचं संकट कोसळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेनं आपल्या अहवालातून धोक्याचा इशारा दिला आहे. २०३० पर्यंत ९ कोटी भारतीयांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असं आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेनं अहवालात म्हटलं आहे. 

येणाऱ्या ७०-८० वर्षांत धान्यांचं उत्पादन कमी होईल. उष्णतेच्या लाटांचं प्रमाण कैकपटीनं वाढेल, असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. वातावरणातील बदलांमुळे २०३० पर्यंत देशातील ९ कोटींहून अधिक लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल. सर्वसामान्य परिस्थितीत हा आकजा ७.३९ कोटी असता, पण वातावरणातील बदलांमुळे हा आकडा २३ टक्क्यांनी वाढेल, अशी आकडेवारी अहवालात आहे.

२०३० पर्यंत कॅलरी ग्रहण करण्याचं प्रमाण होईल. सामान्य परिस्थितीत एक व्यक्ती दिवसाकाठी २ हजार ६९७ कॅलरी ग्रहण करतो. वातावरणातील बदलांमुळे हाच आकडा २ हजार ६५१ वर येईल. वातावरणातील उत्पादनाचा परिणाम खाद्य उत्पादनावरही होईल. धान्य, फळं, भाज्या, तेलबिया, डाळी, मांस यांचं उत्पादन कमी होईल. २१०० पर्यंत देशाचं तापमान २.४ अंश सेल्सिअस ते ४.४ अंश सेल्सिअसनं वाढेल. उष्णतेच्या लाटांचं प्रमाण तिप्पट ते चौपट होईल.

तापमान वाढीचा परिणाम धान्यांच्या उत्पादनावर होईल. २०४१ ते २०६० च्या दरम्यान उत्पादन १.८ ते ६.६ टक्क्यांनी घसरेल. २०६१ ते २०८० च्या दरम्यान धान्य उत्पादनात ७.२ ते २३.६ टक्क्यांची घट होईल. हरित वायूंचं उत्सर्जन कमी करण्यासाठी वायव्य भारतात तांदळाऐवजी इतर धान्यांचं उत्पादन घेण्यात यावं असा सल्ला देण्यात आला आहे.