शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

९,४०० ‘शत्रू मालमत्ता’ विकण्याची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:47 IST

फाळणी, तसेच पाकिस्तान आणि चीनशी झालेल्या युद्धांनंतर त्या देशांच्या नागरिकांच्या भारतात मागे राहिलेल्या ९,४०० हून अधिक स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे.

नवी दिल्ली : फाळणी, तसेच पाकिस्तान आणि चीनशी झालेल्या युद्धांनंतर त्या देशांच्या नागरिकांच्या भारतात मागे राहिलेल्या ९,४०० हून अधिक स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे. कायद्याच्या भाषेत अशा मालमत्तांना ‘शत्रू मालमत्ता’ (एनिमी प्रॉपर्टिज) असे संबोधले जाते.या मालमत्तांचे मूळ मालक कधीकाळी भारतात वास्तव्य करीत होते व कालांतराने त्यांनी चीन व पाकिस्तानचे नागरिक्तव घेऊन तेथे स्थलांतर केलेले आहे. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी भारत सरकारने ४९ वर्षांपूर्वी ‘शत्रू मालमत्ता’ कायदा केला होता. अलीकडेच या कायद्यात दुरुस्ती करून मूळ मालकांच्या वारसांचा या मालमत्तांवरील हक्क कायमचा संपुष्टात आणण्यात आला आहे.सूत्रांनुसार ही कायदेशीर व्यवस्था केल्यानंतर आता या मालमत्ता विकून त्यातून पैसा उभा करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे. या स्थावर मालमत्तांची आजच्या भावानुसार किंमत एक लाख कोटी रुपयांच्या घरात असावी, असा अंदाज असून त्या खरोखरच तेवढ्याला विकल्या गेल्या तर सरकारला यातून मोठे घबाड मिळण्याची अपेक्षा आहे.अधिकृत सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी संबंधित अधिकाºयांची अलीकडेच बैठक घेऊन यापैकी ज्या मालमत्ता कोणत्याही वाद-कज्ज्यात अडकलेल्या नाहीत त्या लवकरात लवकर विकण्याचे निर्देश दिले.या प्रक्रियेची पूर्वतयारी म्हणून अशा सर्व मालमत्तांची नेमकी गणना करणे, सर्वेक्षण करणे व मूल्यांकन करणे ही कामे सध्या केली जात आहेत.१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर मूळ ‘शत्रू मालमत्ता’ कायदा’ केला गेला. या कायद्यानुसार ‘कस्टोडियन आॅफ एनिमी प्रॉपर्टिज’ या विशेष प्राधिकाºयांची नेमणूक करून मालमत्ताचा ताबा व देखभालीचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे.९२८० मालमत्ता पाकिस्तानी नागरिकांच्या तर १२६ चिनी नागरिकांच्या आहेत. पाकिस्तानी नागरिकांच्या मालमत्तांपैकी सर्वाधिक ४,९९१ मालमत्ता उत्तर प्रदेशात आहेत. त्या खालोखाल प. बंगालमध्ये २,७३५ व दिल्लीत ४८७ अशी त्यांची लक्षणीय संख्या आहे. चिनी नागरिकांच्या मालमत्तापैकी सर्वाधिक ५७ मेघालयमध्ये तर प. बंगालमध्ये २९ व आसाममध्ये सात मालमत्ता आहेत.