शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

२० हजारऐवजी अवघे ८९८ मानसशास्त्रज्ञ! आरोग्य विभागाची आकडेवारी, मानसिक उपचार व्यवस्थेचे विदारक चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:42 IST

संपूर्ण देशाला सध्या एकूण २०,२५० मानसशास्त्रज्ञांची गरज आहे. परंतु आज देशाच्या सरकारी आरोग्य विभागाकडे केवळ ८९८ मानसशास्त्रज्ञ आहेत, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली. तसेच सध्या ३७ हजार मानसिक आरोग्य कार्यकर्त्यांची गरज असताना देशात केवळ ९०० कार्यकर्ते उपलब्ध आहेत, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला सध्या एकूण २०,२५० मानसशास्त्रज्ञांची गरज आहे. परंतु आज देशाच्या सरकारी आरोग्य विभागाकडे केवळ ८९८ मानसशास्त्रज्ञ आहेत, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली. तसेच सध्या ३७ हजार मानसिक आरोग्य कार्यकर्त्यांची गरज असताना देशात केवळ ९०० कार्यकर्ते उपलब्ध आहेत, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी ही माहिती दिली. जानेवारी २०१५ मध्ये देशाला एकूण १३,५०० मानसशास्त्रज्ञांची गरज असताना त्या घडीला केवळ ३,८२७ उपलब्ध होते, असेही त्यांनी सांगितले. लोकसभेत त्यांना देशात मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाºया व्यावसायिकांची संख्या कमी असण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले की, देशाला सध्या ३००० मानसिक उपचार परिचारिकांची गरज असताना केवळ १५०० उपलब्ध आहेत.सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात२०११ च्या जनगनणेनुसार देशात ७.२२ लाख लोक मानसिक व्याधींनी ग्रस्त असल्याचे आणि १५ लाखांहून अधिक लोक बौद्धिकदृष्ट्या अक्षम असल्याचे आढळून आले होते.उत्तर प्रदेशात देशातील सर्वाधिक ७६,६०३ लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक व्याधीने ग्रस्त आढळले आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ७१,५१५, केरळमध्ये ६६,९१५ तर महाराष्ट्रात ५८,७५३ लोक मानसिक व्याधींनी ग्रस्त असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य