शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

भारतात दर १० लाख लोकांमागे कोरोनाचे ८७ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 05:45 IST

जगातील सर्वांत कमी प्रमाण; ९६.५३ टक्के लोक झाले बरे; देशात २ लाख १३ हजार रुग्णांवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गेल्या सात दिवसांत भारतामध्ये दर १० लाख लोकांमागे कोरोनाचे ८७ नवे रुग्ण सापडत असून, हे जगातील सर्वात कमी प्रमाण आहे. या आजारातून एक कोटी एक लाख ६२ हजारांहून अधिक लोक बरे झाले असून, त्याचे प्रमाण ९६.५३ टक्के आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांपेक्षा कमी आहे. 

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी देशात १५,५९० नवे कोरोना रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०५२७६८३ झाली आहे. त्यातील १०१६२७३८ जण बरे झाले आहेत. शुक्रवारी या आजारामुळे आणखी १९१ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींची एकूण संख्या १५१९१८ झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४४ टक्के झाला आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या २१३०२७ आहे.जगभरात कोरोनाचे नऊ कोटी ३६ लाख रुग्ण असून, त्यातील सहा कोटी ६९ लाख रुग्ण बरे झाले आहेत. अमेरिकेमध्ये दोन कोटी ३८ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील एक कोटी ४१ लाख जण बरे झाले. 

५० वर्षे वयापुढील नागरिकांच्या आकडेवारीसाठी मतदारयाद्यांचा वापरलसीकरणासाठी प्राधान्य गटात असलेल्या ५० वर्षे वयापुढील नागरिकांची नेमकी संख्या कळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ताज्या लोकसभा व विधानसभा निवडणूक मतदार याद्यांतील नोंदी तपासल्या जाणार आहेत. लसीकरणासाठी ५० वर्षे वयापुढील व्यक्तींची मिळवलेली माहिती ही मोहीम संपल्यानंतर केंद्रीय आरोग्य खात्याने त्यांच्या नोंदीमधून काढून टाकावी, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटले आहे की,  निवडणूक आयोगाने सरकारला मदत करावी. 

मृत्यूदर कमी असलेल्या देशांमध्ये भारतभारतामधील कोरोना रुग्ण, उपचाराधीन रुग्ण व बळींची संख्या अमेरिकेपेक्षा कमी आहे. गेल्या सात दिवसांमध्ये भारतामध्ये दर १० लाख लोकांमागे केवळ एक जण कोरोनामुळे मरण पावला आहे.  जगात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या