शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
4
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
5
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
6
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
7
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
8
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
9
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
10
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
11
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
12
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
13
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
14
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
15
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
16
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
17
Viral Video: पाळीव कुत्र्यासोबत सायकलवरून १२००० किमी प्रवास, तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
18
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
19
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
20
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन

दिल्लीतील ८७ फटाके विक्रेत्यांचे परवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 21:22 IST

गेल्या वर्षापर्यंत दिल्लीत पोलिसांच्या परवाना विभागातून फटाके व्यापा-यांना सर्रास परवाने दिले जात होते.

नवी दिल्ली : गेल्या वर्षापर्यंत दिल्लीत पोलिसांच्या परवाना विभागातून फटाके व्यापा-यांना सर्रास परवाने दिले जात होते. मात्र, यंदा संपूर्ण दिल्लीतून केवळ ११ व्यापा-यांना फटाके विक्रीसाठी परवाने देण्यात आले आहेत. अग्निशमन दलाने ९८ पैकी ८७ अर्ज बाद करताना केवळ ११ व्यापा-यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले. सर्वोच्च न्यायालयाने हरित फटाके वापरण्याचे आदेश देताना व्यापा-यांना परवाना देण्यावर काही निर्बंध घातले होते. त्याचप्रमाणे परवाना देताना सर्व बाबी तपासण्यासही सांगण्यात आले होते.परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी २७ ते ३० सप्टेंबरचा कालावधी निश्चित केला होता. संपूर्ण दिल्लीतून केवळ ९८ व्यापा-यांनी परवान्यासाठी अर्ज केले होते. नियमांची अंमलबजावणी न केल्याने अग्निशमन विभागाने ८७ अर्ज बाद केले. ११ व्यापा-यांना अस्थायी परवाने देण्यात आले आहेत. पक्के दुकान असणारे व्यापारी २४ दिवस आणि तात्पुरते दुकान असणारे व्यापारी १५ दिवस हरित फटाक्यांची विक्री करू शकणार आहेत. परवान्याचे अर्ज बाद केल्यामुळे व्यापा-यांमध्ये नाराजी आहे.

प्रदूषणात होणा-या वाढीमुळे पोलीस फटाके विक्री व्यापा-यांवर लक्ष ठेवून असणार आहेत. दिल्लीत दिवाळीत रात्री केवळ दोन तास फटाके वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी फटाके वाजवण्यासाठी २५०० ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. यंदा परवाना विभागाने दिल्ली महापालिका, दिल्ली  कॅन्टोन्मेंट या संस्थांना पत्र लिहून फटाके वाजवण्यासाठी जागा वाढवण्याबाबत विचारणा केली होती. मात्र, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. प्रदूषण पसरवणारे फटाके उडवणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गेल्या वर्षी ६० लोकांना प्रदूषण पसरवणारे फटाके विक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.  फटाके उडवण्याबाबत जनजागृतीप्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधिकारी स्थानिक नागरिकांमध्ये फटाके उडवण्याबाबत जनजागृती करणार आहेत. लोकांनी ठरवून दिलेल्या वेळेतच हरित फटाके उडवावेत यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. पत्रके वाटून हरित फटाके उडवण्यासाठी माहिती दिली जाणार आहे. सामान्य फटाक्यांमधून मोठ्या प्रमाणात विषारी वायू बाहेर पडतो. मात्र, हरित फटाके उडवल्यानंतर बाहेर पडणा-या विषारी वायूचे प्रमाण कमी असते.