शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील ८७ फटाके विक्रेत्यांचे परवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 21:22 IST

गेल्या वर्षापर्यंत दिल्लीत पोलिसांच्या परवाना विभागातून फटाके व्यापा-यांना सर्रास परवाने दिले जात होते.

नवी दिल्ली : गेल्या वर्षापर्यंत दिल्लीत पोलिसांच्या परवाना विभागातून फटाके व्यापा-यांना सर्रास परवाने दिले जात होते. मात्र, यंदा संपूर्ण दिल्लीतून केवळ ११ व्यापा-यांना फटाके विक्रीसाठी परवाने देण्यात आले आहेत. अग्निशमन दलाने ९८ पैकी ८७ अर्ज बाद करताना केवळ ११ व्यापा-यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले. सर्वोच्च न्यायालयाने हरित फटाके वापरण्याचे आदेश देताना व्यापा-यांना परवाना देण्यावर काही निर्बंध घातले होते. त्याचप्रमाणे परवाना देताना सर्व बाबी तपासण्यासही सांगण्यात आले होते.परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी २७ ते ३० सप्टेंबरचा कालावधी निश्चित केला होता. संपूर्ण दिल्लीतून केवळ ९८ व्यापा-यांनी परवान्यासाठी अर्ज केले होते. नियमांची अंमलबजावणी न केल्याने अग्निशमन विभागाने ८७ अर्ज बाद केले. ११ व्यापा-यांना अस्थायी परवाने देण्यात आले आहेत. पक्के दुकान असणारे व्यापारी २४ दिवस आणि तात्पुरते दुकान असणारे व्यापारी १५ दिवस हरित फटाक्यांची विक्री करू शकणार आहेत. परवान्याचे अर्ज बाद केल्यामुळे व्यापा-यांमध्ये नाराजी आहे.

प्रदूषणात होणा-या वाढीमुळे पोलीस फटाके विक्री व्यापा-यांवर लक्ष ठेवून असणार आहेत. दिल्लीत दिवाळीत रात्री केवळ दोन तास फटाके वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी फटाके वाजवण्यासाठी २५०० ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. यंदा परवाना विभागाने दिल्ली महापालिका, दिल्ली  कॅन्टोन्मेंट या संस्थांना पत्र लिहून फटाके वाजवण्यासाठी जागा वाढवण्याबाबत विचारणा केली होती. मात्र, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. प्रदूषण पसरवणारे फटाके उडवणा-यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गेल्या वर्षी ६० लोकांना प्रदूषण पसरवणारे फटाके विक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.  फटाके उडवण्याबाबत जनजागृतीप्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधिकारी स्थानिक नागरिकांमध्ये फटाके उडवण्याबाबत जनजागृती करणार आहेत. लोकांनी ठरवून दिलेल्या वेळेतच हरित फटाके उडवावेत यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. पत्रके वाटून हरित फटाके उडवण्यासाठी माहिती दिली जाणार आहे. सामान्य फटाक्यांमधून मोठ्या प्रमाणात विषारी वायू बाहेर पडतो. मात्र, हरित फटाके उडवल्यानंतर बाहेर पडणा-या विषारी वायूचे प्रमाण कमी असते.