शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

india china faceoff : चीनसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर LACवर ITBP चे आठ हजार जवान तैनात होणार, केंद्रीय गृहराज्यमंत्री Nityanand Rai यांची घोषणा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 13:26 IST

india china faceoff: केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितसे की, भारत आणि चीन यांच्यात असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारत-तिबेट सीमा पोलिसांसाठी नव्या बटालियनची मंजुरी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितसे की, भारत आणि चीन यांच्यात असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारत-तिबेट सीमा पोलिसांसाठी नव्या बटालियनची मंजुरी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच सरकार सर्व सुरक्षा दलांना परिवहन आणि रसद मदत प्रदान करण्याबाबत कटिबद्ध आहे. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी रविवारी आयटीबीपीच्या ६० व्या स्थापना दिनी केलेल्या संबोधनामध्ये ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, सरकारने गेल्या वर्षी आयटीबीपीसाठी ४७ नव्या सीमा चौक्या आणि एक डझन छावण्यांना मान्यता दिली होती. राय यांनी सांगितले की, आयटीबीपीसाठी नवे मनुष्यबळ आणि बटालियन उपलब्ध करण्यासाठी विचार विमर्ष अंतिम टप्प्यात आहे. तर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आयटीबीपीला आपल्या नव्या सीमा छावण्यांसाठी सुमारे आठ हजार जवान आणि सात नव्या बटालियनांना मान्यता देण्याची अपेक्षा आहे. ही नवी बटालियन मुख्यत्वेकरून भारताच्या पूर्व भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अरुणाचल प्रदेश सेक्टरमध्ये तैनात करण्यात येतील.

आयटीबीपीच्या नव्या बटालियनांनी पूर्वोत्तर भागात एका सेक्टर मुख्यालयाला मान्यता देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाजवळ दोन वर्षांहून अधिक काळापासून विचाराधीन आहे. आयटीबीपीच्या एका बटालियनमध्ये सुमारे एक हजार जवान असतात. राय यांनी गेल्या वर्षी मे-जून महिन्यात पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत झालेल्या हिंसक चकमक आणि दोन्ही देशांदरम्यान, सुरू असलेल्या तणावादरम्यान असामान्य शौर्याचे प्रदर्शन करून शत्रूला चोख उत्तर दिल्याबद्दल आयटीबीपीच्या जवानांचे कौतुक केले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावCentral Governmentकेंद्र सरकार