शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

india china faceoff : चीनसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर LACवर ITBP चे आठ हजार जवान तैनात होणार, केंद्रीय गृहराज्यमंत्री Nityanand Rai यांची घोषणा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 13:26 IST

india china faceoff: केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितसे की, भारत आणि चीन यांच्यात असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारत-तिबेट सीमा पोलिसांसाठी नव्या बटालियनची मंजुरी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितसे की, भारत आणि चीन यांच्यात असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारत-तिबेट सीमा पोलिसांसाठी नव्या बटालियनची मंजुरी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच सरकार सर्व सुरक्षा दलांना परिवहन आणि रसद मदत प्रदान करण्याबाबत कटिबद्ध आहे. केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी रविवारी आयटीबीपीच्या ६० व्या स्थापना दिनी केलेल्या संबोधनामध्ये ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, सरकारने गेल्या वर्षी आयटीबीपीसाठी ४७ नव्या सीमा चौक्या आणि एक डझन छावण्यांना मान्यता दिली होती. राय यांनी सांगितले की, आयटीबीपीसाठी नवे मनुष्यबळ आणि बटालियन उपलब्ध करण्यासाठी विचार विमर्ष अंतिम टप्प्यात आहे. तर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आयटीबीपीला आपल्या नव्या सीमा छावण्यांसाठी सुमारे आठ हजार जवान आणि सात नव्या बटालियनांना मान्यता देण्याची अपेक्षा आहे. ही नवी बटालियन मुख्यत्वेकरून भारताच्या पूर्व भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अरुणाचल प्रदेश सेक्टरमध्ये तैनात करण्यात येतील.

आयटीबीपीच्या नव्या बटालियनांनी पूर्वोत्तर भागात एका सेक्टर मुख्यालयाला मान्यता देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाजवळ दोन वर्षांहून अधिक काळापासून विचाराधीन आहे. आयटीबीपीच्या एका बटालियनमध्ये सुमारे एक हजार जवान असतात. राय यांनी गेल्या वर्षी मे-जून महिन्यात पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनसोबत झालेल्या हिंसक चकमक आणि दोन्ही देशांदरम्यान, सुरू असलेल्या तणावादरम्यान असामान्य शौर्याचे प्रदर्शन करून शत्रूला चोख उत्तर दिल्याबद्दल आयटीबीपीच्या जवानांचे कौतुक केले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावCentral Governmentकेंद्र सरकार