शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

मोदी-शाहांवर नामुष्की! 'ते' ८०० हिंदू पाकिस्तानात परतले; भारताकडून मोठा अपेक्षाभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 4:19 PM

'त्या' ८०० हिंदूंना पाकिस्तानला जावं लागलं; पाकिस्ताननं भारताची बदनामी करण्यासाठी वापरलं

 जयपूर/नवी दिल्ली: भारताकडून नागरिकत्व न मिळाल्यानं पाकिस्तानातून आलेले ८०० हिंदू नागरिक पुन्हा पाकिस्तानला गेले आहेत. भारताकडून अपेक्षाभंग झाल्यानं हिंदू नागरिकांवर पाकिस्तानला परतण्याची वेळ आली. सीमांत लोक संघटनेनं ही माहिती दिली. या प्रकरणी ऑनलाईन यंत्रणेचा आढावा घेतला जात असल्याची माहिती गृह मंत्रालयानं दिली.

शेजारच्या देशांमध्ये असलेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल अशी घोषणा मोदी सरकारनं केली होती. त्यामुळे अत्याचार सहन करत असलेले पाकिस्तानातील शेकडो नागरिक भारतात आले. यातील जवळपास ८०० पाकिस्तानी हिंदू पुन्हा पाकिस्तानाल गेले आहेत. हे नागरिक २०२१ मध्ये भारतात आले होते. भारताचं नागरिकत्व लवकर मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र कित्येक महिने उलटूनही नागरिकत्व न मिळाल्यानं ८०० पाकिस्तानी हिंदूंना पुन्हा पाकिस्तानला जावं लागलं. हे ८०० हिंदू नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून राजस्थानात राहत होते.

नागरिकत्वासाठी अर्ज करूनही कित्येक महिने काहीच न झाल्यानं ८०० नागरिक पाकिस्तानला परत केले. ते परतल्यावर पाकिस्तानच्या यंत्रणांनी त्यांचा भारताविरोधात वापर केला. त्यांना माध्यमांसमोर आणण्यात आलं. भारतात अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचं त्यांच्याकडून वदवून घेण्यात आलं, अशी माहिती सीमांत लोक संघटनेचे अध्यक्ष हिंदू सिंह सोधा यांनी दिली.

शेजारी राष्ट्रांमध्ये असलेल्या अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी मोदी सरकारनं २०१८ मध्ये ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि बुद्धिस्ट यांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. त्यासाठी गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, हरयाणा आणि पंजाबमधील १३ जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले होते.