शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची होळी भेट; एकाचवेळी बँकेत २ लाख जमा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 10:54 IST

केंद्र सरकार ५ राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आणि होळीच्या पूर्वी कर्मचाऱ्यांना ही भेट देण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली – केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच केंद्र सरकारकडून मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार मागील १८ महिन्यांची DA थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्याच्या तयारीत आहे. महागाई भत्ता थकबाकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर केंद्र सरकारने १८ महिन्याचा महागाई भत्ता थकबाकी एकाचवेळी दिली तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात २ लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार ५ राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आणि होळीच्या पूर्वी कर्मचाऱ्यांना ही भेट देण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचारी सातत्याने जानेवारी २०२० ते जून २०२१ या १८ महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकी देण्याची मागणी करत आहेत. मात्र कोरोना काळ आणि निवडणुका असल्याने हा निर्णय लांबणीवर पडला. आता ५ राज्यांच्या निवडणुकीचा अखेरचा टप्पा आला आहे. १० मार्चला या निवडणुकीचे निकाल लागतील. त्यामुळे केंद्र सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे सचिव शिवगोपाळ मिश्रा यांच्यानुसार, केंद्र सरकारच्या संबंधित खात्यासोबत झालेल्या संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता थकबाकीवर चर्चा करण्यात आली. निवडणुका संपल्या असल्याने आता केंद्र सरकार यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितले.

बँक खात्यात येतील २ लाख रुपये

जर केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या १८ महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकीचं पेमेंट केले. तर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात २ लाख रुपयांहून अधिक पैसे जमा होऊ शकतात. लेवल १ कर्मचाऱ्यांच्या डीएत ११, ८०० ते ३७ हजार रुपये जमा होतील. लेवल १३ कर्मचाऱ्यांच्या डीएत १ लाख ४४ हजार २०० ते २ लाख १८ हजार २०० रुपये जमा होतील. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए दिला जाईल. केंद्राच्या या निर्णयानं सरकारी कर्मचाऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होण्याची शक्यता आहे.

केंद्र सराकरकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वर्षातून दोनवेळे महागाई भत्ता वाढ होऊन मिळतो. बाजारातील जीवनावश्यक किंमतीतील वाढ लक्षात घेऊन हा महागाई भत्ता देण्यात येतो. मात्र, देशात कोरोनामुळे जी आर्थिक स्थिती उद्भवली होती, हे लक्षात घेऊन पुढील १.५ वर्षांपर्यंत महाभाई भत्त्याच्या रुपाने होणारी कुठलीही पगारवाढ मिळणार नाही असं सरकारने स्पष्ट केले होते.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार