शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची होळी भेट; एकाचवेळी बँकेत २ लाख जमा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 10:54 IST

केंद्र सरकार ५ राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आणि होळीच्या पूर्वी कर्मचाऱ्यांना ही भेट देण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली – केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच केंद्र सरकारकडून मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार मागील १८ महिन्यांची DA थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्याच्या तयारीत आहे. महागाई भत्ता थकबाकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर केंद्र सरकारने १८ महिन्याचा महागाई भत्ता थकबाकी एकाचवेळी दिली तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात २ लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार ५ राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आणि होळीच्या पूर्वी कर्मचाऱ्यांना ही भेट देण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचारी सातत्याने जानेवारी २०२० ते जून २०२१ या १८ महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकी देण्याची मागणी करत आहेत. मात्र कोरोना काळ आणि निवडणुका असल्याने हा निर्णय लांबणीवर पडला. आता ५ राज्यांच्या निवडणुकीचा अखेरचा टप्पा आला आहे. १० मार्चला या निवडणुकीचे निकाल लागतील. त्यामुळे केंद्र सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे सचिव शिवगोपाळ मिश्रा यांच्यानुसार, केंद्र सरकारच्या संबंधित खात्यासोबत झालेल्या संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता थकबाकीवर चर्चा करण्यात आली. निवडणुका संपल्या असल्याने आता केंद्र सरकार यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितले.

बँक खात्यात येतील २ लाख रुपये

जर केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या १८ महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकीचं पेमेंट केले. तर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात २ लाख रुपयांहून अधिक पैसे जमा होऊ शकतात. लेवल १ कर्मचाऱ्यांच्या डीएत ११, ८०० ते ३७ हजार रुपये जमा होतील. लेवल १३ कर्मचाऱ्यांच्या डीएत १ लाख ४४ हजार २०० ते २ लाख १८ हजार २०० रुपये जमा होतील. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए दिला जाईल. केंद्राच्या या निर्णयानं सरकारी कर्मचाऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होण्याची शक्यता आहे.

केंद्र सराकरकडून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वर्षातून दोनवेळे महागाई भत्ता वाढ होऊन मिळतो. बाजारातील जीवनावश्यक किंमतीतील वाढ लक्षात घेऊन हा महागाई भत्ता देण्यात येतो. मात्र, देशात कोरोनामुळे जी आर्थिक स्थिती उद्भवली होती, हे लक्षात घेऊन पुढील १.५ वर्षांपर्यंत महाभाई भत्त्याच्या रुपाने होणारी कुठलीही पगारवाढ मिळणार नाही असं सरकारने स्पष्ट केले होते.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार