शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

75 लाख लोक झाले एप्रिलमध्ये बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 01:42 IST

चार महिन्यांतील उच्चांक : शहरी भागात दर जास्त

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी स्थानिक पातळीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे एप्रिलमध्ये ७५ लाख लोक बेरोजगार झाले आहेत. त्याबरोबर देशातील बेरोजगारीचा दर ८ टक्के झाला असून, बेरोजगारीने  कॅलेंडर वर्षातील चार महिन्यांमधील उच्चांक गाठला आहे.

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने (सीएमआयई) एका अहवालात ही माहिती दिली आहे. ‘सीएमआयई’चे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महेश व्यास यांनी सांगितले की, आगामी काळातही रोजगाराच्या बाबतीत आव्हानात्मक परिस्थिती राहील. स्थानिक पातळीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनसदृश निर्बंधांमुळे एप्रिलमध्ये देशात ७५ लाख लोक बेरोजगार झाले आहेत. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, राष्ट्रीय बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये ७.९७ टक्के झाला आहे. शहरी भागातील बेरोजगारीचा दर ९.७८ टक्के, तर ग्रामीण भागात ७.१३ टक्के आहे. मार्चमध्ये राष्ट्रीय बेरोजगारीचा दर ६.५० टक्के होता. 

व्यास यांनी सांगितले की, कोविड-१९ साथ सर्वोच्च पातळीवर केव्हा पोहोचेल, याची मला माहिती नाही. तथापि, यामुळे रोजगारावर दबाव राहील, हे नक्की. पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी परिस्थिती जितकी वाईट होती, तितकी यावेळी नाही. गेल्या लाॅकडाऊनच्या काळामध्ये बेरोजगारीचा दर २४ टक्क्यांवर गेला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी