शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

बापरे! 'या' जिल्ह्यात एक, दोन नव्हे, तर तब्बल ७० हजार 'विजय माल्ल्या'; बँका शोधून शोधून दमल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 12:15 IST

बँकांकडून 'विजय माल्ल्यां'चा शोध सुरू; कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप

कानपूर: देशातील अनेक बँकांमध्ये मार्च एंडची तयारी सुरू आहे. कर्जाची परतफेड न करणाऱ्या ग्राहकांचा शोध बँकांकडून सुरू आहे. अनेकांनी लहान रकमेची कर्ज फेडलेली नाहीत. कर्ज बुडित खात्यानं गेल्यानं बँका वैतागल्या आहेत. कानपूरमधील ७० हजार ग्राहकांनी कर्ज फेडलेलं नाही. त्यामुळे बँका संकटात सापडल्या आहेत. ७० हजार ग्राहकांपैकी अनेकांनी पर्सनल, वाहनांसाठी कर्ज घेतलं आहे. तर काहींनी सरकारी योजनांच्या अंतर्गत कर्ज घेतलं आहे.

आर्थिक वर्ष संपत आल्यानं बँका कर्जाचा लेखाजोखा मांडत आहेत. मात्र कानपुरातील जवळपास ७० हजार जणांनी बँकांची झोप उडवली आहे. जिल्ह्यातील विविध बँकांकडून २.४ लाख जणांनी कर्ज घेतलं आहे. कर्जाची रक्कम २ लाखांच्या आत आहे. यापैकी ७० हजार जणांनी कर्जाचे तीन ते पाच हफ्ते भरलेले नाहीत. यातील बहुतांश जणांनी पर्सनल लोन घेतलं आहे. या कर्जासाठी काहीच तारण ठेवलं जात नाही. त्यामुळे ही रक्कम वसूल कशी करायची असा प्रश्न बँकांना पडला आहे. कर्ज घेतलेल्या अनेकांनी नोकरी बदलली आहे. काहींनी शहरच सोडलं आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचं आव्हान बँकांसमोर आहे.

छोट्या रकमेच्या कर्जाची गॅरंटी नाहीकाही सरकारी योजनांमधून १० ते ५० हजार रुपयांचं कर्ज लाभार्थ्यांना मिळतं. त्यांच्याकडून कोणतीही गॅरंटी घेतली जात नाही. अशा व्यक्तींकडून कर्जाची वसुली करणं अवघड जातं. यातील बहुतांश लोक भाड्याच्या घरात राहतात. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे या व्यक्ती घरं बदलत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींना दिलेल्या कर्जाची वसुली करणं बँकांसाठी आव्हानात्मक असतं.