शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

देशात पाच वर्षांत 68 सहकारी बँका बंद, 14 बँका महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 11:19 IST

२०२० च्या आर्थिक वर्षात बँकांनी ४८०० कोटी रुपये केले हाेते निर्लेखित

हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात गेल्या पाच वर्षांत तब्बल ६८ नागरी सहकारी बँका आणि सोसायट्या बंद पडल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत बंद झालेल्या सहकारी बँकांमध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा १४ बँकांसह सर्वाधिक होता तर, इतर सात मोठ्या बँकांमध्ये विलीन किंवा एकत्रिकरण करण्यात आले आहे. गत पाच वर्षांत देशातील २६ सहकारी बँका बंद पडल्या तर, एकूण ४२ सहकारी बँका इतर बँकांमध्ये विलीन कऱण्यात आल्या. या ४२ पैकी महाराष्ट्राचा वाटा ७ इतका होता. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्या बँकांचे परवाने रद्द केले आहेत किंवा त्यांचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण केले आहे. २०२१ मध्ये १५३१ नागरी सहकारी बँका आणि ९७,००६ ग्रामीण सहकारी बँका कार्यरत असल्याने हा आकडा कमी मानला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील डेटा सांगतो की, नागरी सहकारी बँकांना आर्थिक वर्ष २०१९ मधील ३,५४४ कोटींच्या नफ्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२० मध्ये ४,८०० कोटींचे संचयी नुकसान झाले आहे. मुख्यत: उच्च एनपीए आणि कमी गुंतवणुकीमुळे बंद पडलेल्या सर्वाधिक बँका या महाराष्ट्र आणि केरळातील आहेत.  या राज्यात बंद पडलेल्या २६ पैकी २ बँका गोव्यातील आहेत. अर्थात, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची तुलना केल्यास सहकारी बँकांचे एनपीए किरकोळ मानले जातात. सरकारने पावसाळी अधिवेशनात संसदेत कबूल केले की, ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सकल एनपीए (अनुत्पादक मालमत्ता) ५.६० लाख कोटी रुपये होती. यापैकी मोठ्या बँकांनी तीन आर्थिक वर्षात २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये ४.९० लाख कोटी निर्लेखित (राईट ऑफ) केले.

नियम आधीपेक्षा कठोर n सहकार मंत्रालय आता गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आल्यानंतर सरकारने सहकारी बँकांचे नियमन करणारे नियम कठोर केले आहेत. त्यांना आरबीआयच्या कठोर कक्षेत आणले आहे. n सार्वजनिक क्षेत्रातील ८ बँकांही एनपीएमुळे बंद झाल्या आहेत आणि त्या इतर बँकांमध्ये विलीन करण्यात आल्या आहेत.

बँका बंद पडण्याची कारणे काय? या बँकांचा एनपीए प्रचंड प्रमाणात वाढला होता. त्यांच्याकडील गुंतवणूक आटू लागली होती. रिझर्व्ह बँकेने काही बँकांवर कारवाई केली होती.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र