शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

देशात पाच वर्षांत 68 सहकारी बँका बंद, 14 बँका महाराष्ट्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 11:19 IST

२०२० च्या आर्थिक वर्षात बँकांनी ४८०० कोटी रुपये केले हाेते निर्लेखित

हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात गेल्या पाच वर्षांत तब्बल ६८ नागरी सहकारी बँका आणि सोसायट्या बंद पडल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत बंद झालेल्या सहकारी बँकांमध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा १४ बँकांसह सर्वाधिक होता तर, इतर सात मोठ्या बँकांमध्ये विलीन किंवा एकत्रिकरण करण्यात आले आहे. गत पाच वर्षांत देशातील २६ सहकारी बँका बंद पडल्या तर, एकूण ४२ सहकारी बँका इतर बँकांमध्ये विलीन कऱण्यात आल्या. या ४२ पैकी महाराष्ट्राचा वाटा ७ इतका होता. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्या बँकांचे परवाने रद्द केले आहेत किंवा त्यांचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण केले आहे. २०२१ मध्ये १५३१ नागरी सहकारी बँका आणि ९७,००६ ग्रामीण सहकारी बँका कार्यरत असल्याने हा आकडा कमी मानला जातो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील डेटा सांगतो की, नागरी सहकारी बँकांना आर्थिक वर्ष २०१९ मधील ३,५४४ कोटींच्या नफ्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२० मध्ये ४,८०० कोटींचे संचयी नुकसान झाले आहे. मुख्यत: उच्च एनपीए आणि कमी गुंतवणुकीमुळे बंद पडलेल्या सर्वाधिक बँका या महाराष्ट्र आणि केरळातील आहेत.  या राज्यात बंद पडलेल्या २६ पैकी २ बँका गोव्यातील आहेत. अर्थात, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची तुलना केल्यास सहकारी बँकांचे एनपीए किरकोळ मानले जातात. सरकारने पावसाळी अधिवेशनात संसदेत कबूल केले की, ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सकल एनपीए (अनुत्पादक मालमत्ता) ५.६० लाख कोटी रुपये होती. यापैकी मोठ्या बँकांनी तीन आर्थिक वर्षात २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये ४.९० लाख कोटी निर्लेखित (राईट ऑफ) केले.

नियम आधीपेक्षा कठोर n सहकार मंत्रालय आता गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आल्यानंतर सरकारने सहकारी बँकांचे नियमन करणारे नियम कठोर केले आहेत. त्यांना आरबीआयच्या कठोर कक्षेत आणले आहे. n सार्वजनिक क्षेत्रातील ८ बँकांही एनपीएमुळे बंद झाल्या आहेत आणि त्या इतर बँकांमध्ये विलीन करण्यात आल्या आहेत.

बँका बंद पडण्याची कारणे काय? या बँकांचा एनपीए प्रचंड प्रमाणात वाढला होता. त्यांच्याकडील गुंतवणूक आटू लागली होती. रिझर्व्ह बँकेने काही बँकांवर कारवाई केली होती.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र