शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

काश्मीरमध्ये 60 दहशतवाद्यांची घुसखोरी

By admin | Updated: August 18, 2016 08:19 IST

काश्मीरमध्ये गेले काही दिवस सुरु असलेल्या हिंसाचाराचा तसंच परिस्थितीचा फायदा घेत 60 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असल्याची माहिती आहे

- ऑनलाइन लोकमत 
श्रीनगर, दि. 18 - काश्मीरमध्ये गेले काही दिवस सुरु असलेल्या हिंसाचाराचा तसंच परिस्थितीचा फायदा घेत 60 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असल्याची माहिती आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवारा आणि उरी सेक्टरमधून ही घुसखोरी करण्यात आली आहे. मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये हे दहशतवादी घुसखोरी करुन लपून बसले असल्याची शक्यता आहे. 
 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार 'दहशतवादी काश्मीर खो-यात उपस्थित असून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी प्रवास करत आहेत. हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वानीचा 8 जुलै रोजी खात्मा केल्यानंतर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराला सुरुवात झाली होती, याचा फायदा घेत दहशतवादी घुसले असल्याचं', गुप्तचर खात्यामधील अधिका-याने सांगितलं आहे. 
 
बुधवारी हिजबूल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी सकाळी 3 वाजता जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. बारामुल्ला येथे झालेल्या या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले होते. हिजबूलने हल्ल्याची जबाबदारी घेत कमांडर सैफुल्लाह खालीदने हल्ला करण्याचे आदेश दिल्याचं त्यांच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं.
 
'गेल्या काही आठवड्यात 60 दहशतवाद्यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी केली आहे. लष्कर या दहशतवाद्यांनी पुन्हा मागे फिरवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात फायरिंग केली जात आहे.  यामध्ये काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यातही यश मिळालं आहे. आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आल्याचं', गुप्तचर अधिका-याने सांगितलं आहे. 
 
हिजबूल मुजाहिद्दीनचे दहशतवादी त्राल परिसरातील तरुणांना प्रशिक्षण देत असून त्यांना भरती करुन घेत आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता श्रीनगरमध्ये संपुर्ण परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे अशी माहिती गुप्तचर अधिका-याने दिली आहे.