शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मध्य प्रदेशात ६० लाख बोगस मतदार; चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:15 IST

मध्य प्रदेशात ६० लाख बोगस मतदार असल्याचा आरोप काँग्रेसने केल्यानंतर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बोगस मतदारांबाबत तक्रार केली आहे.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात ६० लाख बोगस मतदार असल्याचा आरोप काँग्रेसने केल्यानंतर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बोगस मतदारांबाबत तक्रार केली आहे. काँग्रेसने हा आरोप करताना निवडणूक आयोगाकडे याबाबत पुरावे सादर केले आहेत.मध्य प्रदेशात ५ कोटी मतदार असून काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार, यातील १२ टक्के मतदार बोगस आहेत. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील मतांचा फरक हा ८.५ टक्के इतका होता. या वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना कमलनाथ आणि शिंदे यांनी याबाबत अनेक उदाहरणे दाखविली. उदाहरणार्थ, मध्य प्रदेशातील भोजपूर मतदारसंघात एका महिलेचे नाव वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर २६ वेळा आहे. कमलनाथ म्हणाले की, आयोगाला आम्ही पुरावे दिले आहेत की, राज्यात ६० लाख बोगस मतदार आहेत आणि हे चुकून झालेले नाही. राज्यातील भाजपा सरकारच्या आदेशावरून हे झाले आहे.चौकशीसाठी दोन पथकेमध्यप्रदेशात ६० लाख बोगस मतदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी पुराव्यासह केल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन पथकांची स्थापना केली आहे. या पथकांकडून ७ जूनपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे. आयोगाने म्हटले आहे की, जर हेतुपुरस्सर चूक दिसून आली तर, उचित कारवाई करण्यास जबाबदारी निश्चित करण्यात येईल.काँग्रेसने १०१ मतदारसंघांत २४.६५ लाख बोगस मतदार शोधले. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढली त्या तुलनेत मतदारांची संख्या विसंगती दर्शवित आहे. हा प्रकार भाजपाकडून करण्यात आला. १० वर्षांत लोकसंख्या २४ टक्क्यांनी वाढत असेल तर मतदार ४० टक्के कसे वाढू शकतात, असा सवालही शिंदे यांनी केला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक