शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘त्या’ कीटकनाशकावर ६० दिवसांची बंदी; एसआयटीची डावलली शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:46 IST

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी कीटकनाशकांच्या फवारणीने विषबाधा होऊन काही शेतकऱ्यांचा बळी गेला होता. या प्रकरणाची चौकशी करणाºया विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोनोक्रोटोफस या कीटकनाशकावर संपूर्ण राज्यात बंदी घालावी अशी शिफारस महाराष्ट्र सरकारला केली होती.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी कीटकनाशकांच्या फवारणीने विषबाधा होऊन काही शेतकऱ्यांचा बळी गेला होता. या प्रकरणाची चौकशी करणाºया विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोनोक्रोटोफस या कीटकनाशकावर संपूर्ण राज्यात बंदी घालावी अशी शिफारस महाराष्ट्र सरकारला केली होती. मात्र राज्य सरकारने फक्त ६० दिवसांचीच बंदी घातली अशी महत्वपूर्ण माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी लोकसभेत दिली.तेलंगणा राष्ट्र समितीच्या ए. पी. जितेंद्र रेड्डी यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. कृषीमंत्र्यांनी पुढे सांगितले की, भारतात वापरण्याच्या दृष्टीने मोनोक्रोटोफस व आॅस्किडेमेन्टन-मिथाईल यांची किटकनाशके कायदा १९६८च्या अन्वये नोंदणी झाली आहे. भाज्यांवर मोनोक्रोटोफसची फवारणी करण्यास याआधीच बंदी घालण्यात आली आहे. मोनोक्रोटोफसामध्ये अन्य काही कीटकनाशके मिसळून त्याची फवारणी शेतकरी पिकांवर करण्यात येते. हे मिश्रण अशास्त्रीय आहे असा निष्कर्ष एसआयटीने आपल्या अहवालात काढला आहे.५४६० नमुने आढळले दर्जाहीनकृषीमंत्री राधामोहन सिंग म्हणाले की, कीटकनाशकांचा दर्जा तपासण्याची केंद्र व राज्य सरकारांकडे संयुक्त जबाबदारी आहे. अयोग्य कीटकनाशकांची विक्री रोखण्यासाठी केंद्र व राज्याने निरीक्षकही नियुक्त केले आहेत. कीटकनाशकांचे नमुने नेहमी गोळा केले जातात व त्यांची राज्यांतील ६९ कीटकनाशक प्रयोगशाळांमध्ये तपासणी जाते. अशीच तपासणी चंदिगढ व कानपूर येथे असलेल्या प्रादेशिक किटकनाशक प्रयोगशाळांमध्येही केली जाते. ज्या कीटकनाशकांमध्ये भेसळ आढळेल किंवा दर्जाहीन अशांच्या उत्पादकांवर कीटकनाशक कायद्यातील तरतूदीनूसार कारवाई केली जाते. २०१४-१५ या कालावधीत कीटकनाशकांचे १९५९२५ नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासले गेले. त्यातील ५४६० नमुने हे दर्जाहीन आढळले.मोनोक्रोटोफस सहित ६६ कीटकनाशकांची एका तज्ज्ञ समितीने २०१३ साली तपासणी केली होती. मोनोक्रोटोफसच्या वापरास काही देशात याआधीच बंदी घालण्यात आली आहे. मात्र या कीटकनाशकाचा वापर सुरु ठेवावा अशी शिफारस या समितीने केली होती. यवतमाळमध्ये कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकºयांचे जे बळी गेले ते प्रकार धक्कादायक होते असेही कृषीमंत्री राधामोहन सिंग म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरी