शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

‘त्या’ कीटकनाशकावर ६० दिवसांची बंदी; एसआयटीची डावलली शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:46 IST

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी कीटकनाशकांच्या फवारणीने विषबाधा होऊन काही शेतकऱ्यांचा बळी गेला होता. या प्रकरणाची चौकशी करणाºया विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोनोक्रोटोफस या कीटकनाशकावर संपूर्ण राज्यात बंदी घालावी अशी शिफारस महाराष्ट्र सरकारला केली होती.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी कीटकनाशकांच्या फवारणीने विषबाधा होऊन काही शेतकऱ्यांचा बळी गेला होता. या प्रकरणाची चौकशी करणाºया विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोनोक्रोटोफस या कीटकनाशकावर संपूर्ण राज्यात बंदी घालावी अशी शिफारस महाराष्ट्र सरकारला केली होती. मात्र राज्य सरकारने फक्त ६० दिवसांचीच बंदी घातली अशी महत्वपूर्ण माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी लोकसभेत दिली.तेलंगणा राष्ट्र समितीच्या ए. पी. जितेंद्र रेड्डी यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. कृषीमंत्र्यांनी पुढे सांगितले की, भारतात वापरण्याच्या दृष्टीने मोनोक्रोटोफस व आॅस्किडेमेन्टन-मिथाईल यांची किटकनाशके कायदा १९६८च्या अन्वये नोंदणी झाली आहे. भाज्यांवर मोनोक्रोटोफसची फवारणी करण्यास याआधीच बंदी घालण्यात आली आहे. मोनोक्रोटोफसामध्ये अन्य काही कीटकनाशके मिसळून त्याची फवारणी शेतकरी पिकांवर करण्यात येते. हे मिश्रण अशास्त्रीय आहे असा निष्कर्ष एसआयटीने आपल्या अहवालात काढला आहे.५४६० नमुने आढळले दर्जाहीनकृषीमंत्री राधामोहन सिंग म्हणाले की, कीटकनाशकांचा दर्जा तपासण्याची केंद्र व राज्य सरकारांकडे संयुक्त जबाबदारी आहे. अयोग्य कीटकनाशकांची विक्री रोखण्यासाठी केंद्र व राज्याने निरीक्षकही नियुक्त केले आहेत. कीटकनाशकांचे नमुने नेहमी गोळा केले जातात व त्यांची राज्यांतील ६९ कीटकनाशक प्रयोगशाळांमध्ये तपासणी जाते. अशीच तपासणी चंदिगढ व कानपूर येथे असलेल्या प्रादेशिक किटकनाशक प्रयोगशाळांमध्येही केली जाते. ज्या कीटकनाशकांमध्ये भेसळ आढळेल किंवा दर्जाहीन अशांच्या उत्पादकांवर कीटकनाशक कायद्यातील तरतूदीनूसार कारवाई केली जाते. २०१४-१५ या कालावधीत कीटकनाशकांचे १९५९२५ नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासले गेले. त्यातील ५४६० नमुने हे दर्जाहीन आढळले.मोनोक्रोटोफस सहित ६६ कीटकनाशकांची एका तज्ज्ञ समितीने २०१३ साली तपासणी केली होती. मोनोक्रोटोफसच्या वापरास काही देशात याआधीच बंदी घालण्यात आली आहे. मात्र या कीटकनाशकाचा वापर सुरु ठेवावा अशी शिफारस या समितीने केली होती. यवतमाळमध्ये कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकºयांचे जे बळी गेले ते प्रकार धक्कादायक होते असेही कृषीमंत्री राधामोहन सिंग म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरी