शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

‘त्या’ कीटकनाशकावर ६० दिवसांची बंदी; एसआयटीची डावलली शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:46 IST

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी कीटकनाशकांच्या फवारणीने विषबाधा होऊन काही शेतकऱ्यांचा बळी गेला होता. या प्रकरणाची चौकशी करणाºया विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोनोक्रोटोफस या कीटकनाशकावर संपूर्ण राज्यात बंदी घालावी अशी शिफारस महाराष्ट्र सरकारला केली होती.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षी कीटकनाशकांच्या फवारणीने विषबाधा होऊन काही शेतकऱ्यांचा बळी गेला होता. या प्रकरणाची चौकशी करणाºया विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोनोक्रोटोफस या कीटकनाशकावर संपूर्ण राज्यात बंदी घालावी अशी शिफारस महाराष्ट्र सरकारला केली होती. मात्र राज्य सरकारने फक्त ६० दिवसांचीच बंदी घातली अशी महत्वपूर्ण माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी लोकसभेत दिली.तेलंगणा राष्ट्र समितीच्या ए. पी. जितेंद्र रेड्डी यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. कृषीमंत्र्यांनी पुढे सांगितले की, भारतात वापरण्याच्या दृष्टीने मोनोक्रोटोफस व आॅस्किडेमेन्टन-मिथाईल यांची किटकनाशके कायदा १९६८च्या अन्वये नोंदणी झाली आहे. भाज्यांवर मोनोक्रोटोफसची फवारणी करण्यास याआधीच बंदी घालण्यात आली आहे. मोनोक्रोटोफसामध्ये अन्य काही कीटकनाशके मिसळून त्याची फवारणी शेतकरी पिकांवर करण्यात येते. हे मिश्रण अशास्त्रीय आहे असा निष्कर्ष एसआयटीने आपल्या अहवालात काढला आहे.५४६० नमुने आढळले दर्जाहीनकृषीमंत्री राधामोहन सिंग म्हणाले की, कीटकनाशकांचा दर्जा तपासण्याची केंद्र व राज्य सरकारांकडे संयुक्त जबाबदारी आहे. अयोग्य कीटकनाशकांची विक्री रोखण्यासाठी केंद्र व राज्याने निरीक्षकही नियुक्त केले आहेत. कीटकनाशकांचे नमुने नेहमी गोळा केले जातात व त्यांची राज्यांतील ६९ कीटकनाशक प्रयोगशाळांमध्ये तपासणी जाते. अशीच तपासणी चंदिगढ व कानपूर येथे असलेल्या प्रादेशिक किटकनाशक प्रयोगशाळांमध्येही केली जाते. ज्या कीटकनाशकांमध्ये भेसळ आढळेल किंवा दर्जाहीन अशांच्या उत्पादकांवर कीटकनाशक कायद्यातील तरतूदीनूसार कारवाई केली जाते. २०१४-१५ या कालावधीत कीटकनाशकांचे १९५९२५ नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासले गेले. त्यातील ५४६० नमुने हे दर्जाहीन आढळले.मोनोक्रोटोफस सहित ६६ कीटकनाशकांची एका तज्ज्ञ समितीने २०१३ साली तपासणी केली होती. मोनोक्रोटोफसच्या वापरास काही देशात याआधीच बंदी घालण्यात आली आहे. मात्र या कीटकनाशकाचा वापर सुरु ठेवावा अशी शिफारस या समितीने केली होती. यवतमाळमध्ये कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकºयांचे जे बळी गेले ते प्रकार धक्कादायक होते असेही कृषीमंत्री राधामोहन सिंग म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरी