शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ

By admin | Updated: March 24, 2016 02:10 IST

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करून त्यांना होळीची भेट दिली आहे. ही वाढ जानेवारीपासून लागू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करून त्यांना होळीची भेट दिली आहे. ही वाढ जानेवारीपासून लागू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात गेल्या एक जानेवारीपासून सहा टक्के वाढीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता १२५ टक्के होणार आहे.दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, ५० लाख कर्मचारी आणि ५८ लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे तयार करण्यात आलेल्या फॉर्म्युल्यानुसार ही वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्तावाढीमुळे सरकारवर वार्षिक १४,७२४.७४ कोटी रुपयांचा बोजा पडेल. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाटा ६७९५.५ कोटी तर पेन्शनधारकांचा ७९२९.२४ कोटी एवढा आहे.गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ११३ टक्क्यांवरून ११९ टक्के करण्यात आला होता. ही वाढ १ जुलै २०१५ पासून लागू झाली होती. तत्पूर्वी एप्रिलमध्ये महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ करून तो ११३ टक्के करण्यात आला होता. १ जानेवारी २०१५ पासून ही वाढ लागू करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)....................................................राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही लवकरच वाढ?केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढताच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही त्याच प्रमाणात वाढ देण्याची आतापर्यंतची पद्धत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त यांनाही लवकरच याचा फायदा होण्याची शक्यता आहे.