शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
2
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
3
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
4
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
5
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
6
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
7
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
8
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
9
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
10
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
11
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
12
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
13
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
14
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
15
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
16
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
17
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
18
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
19
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
20
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर

सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत १२ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 5:09 AM

मोदींकडून वितरण; पंतप्रधान किसान सन्मान योजना

टुुमकुरू (कर्नाटक) : पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत एकाच वेळी देशातील सहा कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी १२ हजार कोटी रुपये जमा केले.येथे एका कार्यक्रमात त्यांनी निवडक शेतकऱ्यांना कृषी सन्मान पुरस्कारही प्रदान केले. मोदी म्हणाले की, काही राज्यांनी अद्याप ही योजना लागू केलेली नाही. क्षुद्र वृत्तीच्या राजकारणामुळे गरीब शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. नव्या वर्षात ही राज्ये या योजनेत सहभागी होतील, असा मला विश्वास वाटतो. शेतकऱ्यांच्या आशाआकांक्षांची पूर्तता करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकºयांना दिलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची दक्षता आम्ही घेतली आहे.मोदी म्हणाले, आमच्या राजवटीत मदतीची सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाते. अनेक वर्षे रखडलेल्या जलसिंचन योजना सरकारने मार्गी लावल्या आहेत. मच्छीमारांना बोटी विकत घेण्यासाठी, बोटींचे आधुनिकीकरण, मासेमारीशी संबंधित सुविधा उभारणीसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत दिली जाते, असेही ते म्हणाले.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्यांनी अल्पसंख्याकांवर धार्मिक अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने करावीत, असा टोला मोदी यांनी विरोधकांना लगावला. ते म्हणाले, धर्माच्या आधारावर निर्मिती झालेल्या पाकमध्ये हिंदू, शीख, जैैन, ख्रिश्चनांवर अत्याचार केले जातात. त्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. पण त्याबद्दल काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष चकार शब्द काढत नाहीत.काय आहे योजना?गेल्या वर्षी ही योजना जाहीर करण्यात आली, तेव्हा अल्पभूधारक शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी चार टप्प्यांत ८ हजार रुपये देण्याचे ठरले होते. नंतर सर्वच शेतकºयांना दर तीन महिन्यांना २ हजार याप्रमाणे एकूण ८ हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यापैकी दोन हप्त्यांची रक्कम शेतकºयांच्या खात्यांत आधीच जमा करण्यात आली आहे. हा तिसरा हप्ता आहे.माहितीसाठी टोल फ्री नबंरया योजनेनुसार शेतकºयांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला की नाही, याची माहिती आता टोल फ्री नंबरच्या माध्यमातून घेता येईल. केंद्राने लाभार्थी शेतकºयांसाठी १५५२६१ हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी