शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत १२ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 07:00 IST

मोदींकडून वितरण; पंतप्रधान किसान सन्मान योजना

टुुमकुरू (कर्नाटक) : पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत एकाच वेळी देशातील सहा कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी १२ हजार कोटी रुपये जमा केले.येथे एका कार्यक्रमात त्यांनी निवडक शेतकऱ्यांना कृषी सन्मान पुरस्कारही प्रदान केले. मोदी म्हणाले की, काही राज्यांनी अद्याप ही योजना लागू केलेली नाही. क्षुद्र वृत्तीच्या राजकारणामुळे गरीब शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. नव्या वर्षात ही राज्ये या योजनेत सहभागी होतील, असा मला विश्वास वाटतो. शेतकऱ्यांच्या आशाआकांक्षांची पूर्तता करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकºयांना दिलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची दक्षता आम्ही घेतली आहे.मोदी म्हणाले, आमच्या राजवटीत मदतीची सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केली जाते. अनेक वर्षे रखडलेल्या जलसिंचन योजना सरकारने मार्गी लावल्या आहेत. मच्छीमारांना बोटी विकत घेण्यासाठी, बोटींचे आधुनिकीकरण, मासेमारीशी संबंधित सुविधा उभारणीसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत दिली जाते, असेही ते म्हणाले.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्यांनी अल्पसंख्याकांवर धार्मिक अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने करावीत, असा टोला मोदी यांनी विरोधकांना लगावला. ते म्हणाले, धर्माच्या आधारावर निर्मिती झालेल्या पाकमध्ये हिंदू, शीख, जैैन, ख्रिश्चनांवर अत्याचार केले जातात. त्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. पण त्याबद्दल काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष चकार शब्द काढत नाहीत.काय आहे योजना?गेल्या वर्षी ही योजना जाहीर करण्यात आली, तेव्हा अल्पभूधारक शेतकºयांच्या खात्यात दरवर्षी चार टप्प्यांत ८ हजार रुपये देण्याचे ठरले होते. नंतर सर्वच शेतकºयांना दर तीन महिन्यांना २ हजार याप्रमाणे एकूण ८ हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यापैकी दोन हप्त्यांची रक्कम शेतकºयांच्या खात्यांत आधीच जमा करण्यात आली आहे. हा तिसरा हप्ता आहे.माहितीसाठी टोल फ्री नबंरया योजनेनुसार शेतकºयांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला की नाही, याची माहिती आता टोल फ्री नंबरच्या माध्यमातून घेता येईल. केंद्राने लाभार्थी शेतकºयांसाठी १५५२६१ हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी