शहरं
Join us  
Trending Stories
1
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
2
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
3
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
4
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
5
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
6
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
7
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
8
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
9
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
10
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
11
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
12
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
13
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
14
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
15
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
16
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
17
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
18
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
19
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ

पिण्याचे पाणी देणाऱ्या ५७,४०० योजना

By admin | Updated: August 12, 2016 03:12 IST

राज्यांतील ग्रामीण भागांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या ५७ हजार ४०० योजना सुरू आहेत आणि २०१५-२०१६ वर्षात या कामासाठी ४,३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले

नवी दिल्ली : वेगवेगळ््या राज्यांतील ग्रामीण भागांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या ५७ हजार ४०० योजना सुरू आहेत आणि २०१५-२०१६ वर्षात या कामासाठी ४,३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. ही माहिती गुरुवारी पेयजल आणि स्वच्छता खात्याचे मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली. राज्यांना २०१५-२०१६ या वर्षात ४ हजार ३७३ कोटी रुपये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आले होते. त्यातील ४,३६९.५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. वेगवेगळ््या राज्यांमध्ये ग्रामीण जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आठ आॅगस्ट रोजी काम ५७,४८९ योजनांद्वारे होत आहे, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या १,८३८ पेयजल योजना सुरू असल्याचे सिंह यांनी प्रश्नोत्तर तासात सांगितले. पिण्याचे पाणी आणि स्वच्छता हे राज्यांचे विषय आहेत. केंद्र सरकारची यातील भूमिका ही राज्यांना तांत्रिक आणि आर्थिक साह्य देणे आणि अशा कार्यक्रमांवर देखरेख ठेवण्याची आहे, असे तोमर म्हणाले. ‘स्वच्छ भारत मिशन’ ग्रामीणबद्दल (एसबीएम-जी) बोलताना तोमर म्हणाले की, या कार्यक्रमाचे लक्ष्य हे दोन आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारत करण्याचे आणि हा कार्यक्रम ज्यांच्याशी संबंधित आहे त्या लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचा आहे. २०१५-२०१६ मध्ये एसबीएम-जीसाठी ६,५२५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले तर त्यातील ६,५२४.५२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन आॅक्टोबर २०१४ रोजी एसबीएम-जीची सुरवात झाली तेव्हापासून आठ आॅगस्ट २०१६ पर्यंत २१२.९८ लाख स्वच्छतागृहे बांधण्यात आली. याशिवाय एकूण १७ जिल्हे, २३२ गट, ३२,३९५ ग्राम पंचायती आणि ७२,७२७ खेडी उघड्यावर संडासला जाण्यापासून मुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, असेही तोमर म्हणाले.