शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पिण्याचे पाणी देणाऱ्या ५७,४०० योजना

By admin | Updated: August 12, 2016 03:12 IST

राज्यांतील ग्रामीण भागांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या ५७ हजार ४०० योजना सुरू आहेत आणि २०१५-२०१६ वर्षात या कामासाठी ४,३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले

नवी दिल्ली : वेगवेगळ््या राज्यांतील ग्रामीण भागांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या ५७ हजार ४०० योजना सुरू आहेत आणि २०१५-२०१६ वर्षात या कामासाठी ४,३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. ही माहिती गुरुवारी पेयजल आणि स्वच्छता खात्याचे मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली. राज्यांना २०१५-२०१६ या वर्षात ४ हजार ३७३ कोटी रुपये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आले होते. त्यातील ४,३६९.५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. वेगवेगळ््या राज्यांमध्ये ग्रामीण जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आठ आॅगस्ट रोजी काम ५७,४८९ योजनांद्वारे होत आहे, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या १,८३८ पेयजल योजना सुरू असल्याचे सिंह यांनी प्रश्नोत्तर तासात सांगितले. पिण्याचे पाणी आणि स्वच्छता हे राज्यांचे विषय आहेत. केंद्र सरकारची यातील भूमिका ही राज्यांना तांत्रिक आणि आर्थिक साह्य देणे आणि अशा कार्यक्रमांवर देखरेख ठेवण्याची आहे, असे तोमर म्हणाले. ‘स्वच्छ भारत मिशन’ ग्रामीणबद्दल (एसबीएम-जी) बोलताना तोमर म्हणाले की, या कार्यक्रमाचे लक्ष्य हे दोन आॅक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारत करण्याचे आणि हा कार्यक्रम ज्यांच्याशी संबंधित आहे त्या लोकांचा दृष्टिकोन बदलण्याचा आहे. २०१५-२०१६ मध्ये एसबीएम-जीसाठी ६,५२५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले तर त्यातील ६,५२४.५२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन आॅक्टोबर २०१४ रोजी एसबीएम-जीची सुरवात झाली तेव्हापासून आठ आॅगस्ट २०१६ पर्यंत २१२.९८ लाख स्वच्छतागृहे बांधण्यात आली. याशिवाय एकूण १७ जिल्हे, २३२ गट, ३२,३९५ ग्राम पंचायती आणि ७२,७२७ खेडी उघड्यावर संडासला जाण्यापासून मुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, असेही तोमर म्हणाले.