शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

५३ वर्षांची आई मुलींसह झाली बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण; घरातील आनंद तिपटीने वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 08:11 IST

त्रिपुरातील शीला राणी दास यांचे खूप कमी वयात लग्न झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले.

आगरतळा : आई व तिच्या दोन मुली एकाच वेळी त्रिपुरा माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  परीक्षा उत्तीर्ण झाल्याची अनोखी घटना घडली आहे. या शिक्षण मंडळाने यंदाच्या १० वी व १२ वी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर केला. त्यात शीला राणी दास (५३ वर्षे) या १० वी व त्यांच्या दोन मुली १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या घरातील आनंद तिपटीने वाढला.

त्रिपुरातील शीला राणी दास यांचे खूप कमी वयात लग्न झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर घर चालविण्यासाठी व दोन मुलींचे पालनपोषण करताना त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. शीला यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. मात्र त्यांना अनेक कारणांनी शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. मुली मोठ्या झाल्या तसे त्यांनी आपल्या आईला आग्रह केला की, तू दहावीची परीक्षा दिलीच पाहिजे. शीला यांच्या मनातही ती इच्छा होतीच. मुलींबरोबर शीला राणी दास यादेखील परीक्षेचा अभ्यास करू लागल्या. अभ्यासात काही अडले की मुली आपल्या आईला तो मुद्दा नीट समजावून सांगत. 

शीला राणी दास यांनी सांगितले की, पन्नाशी उलटल्यानंतरही मी दहावीची परीक्षा देत असताना मुली किंवा ओळखीच्या लोकांनी मला प्रोत्साहनच दिले. त्यामुळेच मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. शीला या आगरतळा येथील अभयनगर स्मृती विद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या. 

मुलींनी अभ्यासात केली आईला मदतशीला राणी दास यांची मुलगी जयश्री यंदा १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने आईच्या यशाबद्दल सांगितले की, आई १० वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली याचा आम्ही सर्वांनाच आनंद झाला आहे. तिला आम्ही अभ्यासात मदत केली. आईला मुळात शिक्षणाची आवड आहे. त्यामुळे तिने जिद्दीने ही परीक्षा देऊन त्यात यश मिळविले.