शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून पाच हजार कोटींची मदत

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून पाच हजार कोटींची मदत

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून पाच हजार कोटींची मदत
राज्यातील विजेचे जाळे मजबूत होणार : ३३ जिल्ह्यातील ३७ प्रस्ताव
मुंबई : ग्रामीण आणि शहरी भागातील विजेचे वितरण आणि जाळे मजबूत करण्याबरोबरच वीज ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी अंदाजे पाच हजार कोटींची मदत मंजूर केली आहे. या दोन्ही योजनांमुळे पायाभूत सुविधा निर्माण होण्यासही मदत होणार आहे.
या दोन्ही योजनांचा उपयोग महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी भागातील वाढते आधुनिकीकरण, वाढती ग्राहक संख्या तसेच सध्या अस्तित्वात असलेेल्या वीज वितरण प्रणालीचे विस्तारीकरण व बळकटीकरण यासाठी करण्यात येणार आहे. या दोन्ही योजनेसाठी मंजूर झालेल्या निधीचा उपयोग महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला होण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.ने दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेसाठी एकूण ३७ प्रस्ताव पाठविले होते. त्यात ३३ जिल्ह्यांचा समावेश होता, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
वाहिनी विलगीकरण (१३०२.८६ कोटी रुपये), घरगुती व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी नागरिकांसाठी नवीन वीज जोडण्या देणे (४४८.७६ कोटी रुपये), वीज वितरण प्रणालीच्या सक्षमीकरणासाठी (९९८.६८ कोटी रुपये), संसद ग्राम योजनेमधील समाविष्ट गावांसाठी (१७ कोटी रुपये) असा एकूण २७५९.२८ कोटी रुपयांचा निधी दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. मंजूर झालेल्या निधीतून ६७ ग्रामपंचायती आणि ६९ गावांना फायदा होणार आहे.
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत वीज प्रणालीचे सक्षमीकरणासाठी (२८९६.७५ कोटी रुपये), मीटर प्रणालीसाठी (११२.०२ कोटी रुपये) आणि सौर प्रकल्प उभारणीसाठी १६६.३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर झालेल्या निधीतून एकूण २५४ प्रस्तावित शहरांना लाभ होणार आहे. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेसाठी केंद्र सरकारकडून मंजूर प्रकल्पाच्या ६० टक्के रक्कम अनुदान स्वरुपात मिळणार आहे. या योजनेसाठी मे. पॉवर फायनान्स कॉपार्ेरेशन (पीएफसी) यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.