शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून पाच हजार कोटींची मदत

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून पाच हजार कोटींची मदत

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून पाच हजार कोटींची मदत
राज्यातील विजेचे जाळे मजबूत होणार : ३३ जिल्ह्यातील ३७ प्रस्ताव
मुंबई : ग्रामीण आणि शहरी भागातील विजेचे वितरण आणि जाळे मजबूत करण्याबरोबरच वीज ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी अंदाजे पाच हजार कोटींची मदत मंजूर केली आहे. या दोन्ही योजनांमुळे पायाभूत सुविधा निर्माण होण्यासही मदत होणार आहे.
या दोन्ही योजनांचा उपयोग महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी भागातील वाढते आधुनिकीकरण, वाढती ग्राहक संख्या तसेच सध्या अस्तित्वात असलेेल्या वीज वितरण प्रणालीचे विस्तारीकरण व बळकटीकरण यासाठी करण्यात येणार आहे. या दोन्ही योजनेसाठी मंजूर झालेल्या निधीचा उपयोग महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला होण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.ने दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेसाठी एकूण ३७ प्रस्ताव पाठविले होते. त्यात ३३ जिल्ह्यांचा समावेश होता, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
वाहिनी विलगीकरण (१३०२.८६ कोटी रुपये), घरगुती व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी नागरिकांसाठी नवीन वीज जोडण्या देणे (४४८.७६ कोटी रुपये), वीज वितरण प्रणालीच्या सक्षमीकरणासाठी (९९८.६८ कोटी रुपये), संसद ग्राम योजनेमधील समाविष्ट गावांसाठी (१७ कोटी रुपये) असा एकूण २७५९.२८ कोटी रुपयांचा निधी दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. मंजूर झालेल्या निधीतून ६७ ग्रामपंचायती आणि ६९ गावांना फायदा होणार आहे.
एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत वीज प्रणालीचे सक्षमीकरणासाठी (२८९६.७५ कोटी रुपये), मीटर प्रणालीसाठी (११२.०२ कोटी रुपये) आणि सौर प्रकल्प उभारणीसाठी १६६.३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर झालेल्या निधीतून एकूण २५४ प्रस्तावित शहरांना लाभ होणार आहे. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेसाठी केंद्र सरकारकडून मंजूर प्रकल्पाच्या ६० टक्के रक्कम अनुदान स्वरुपात मिळणार आहे. या योजनेसाठी मे. पॉवर फायनान्स कॉपार्ेरेशन (पीएफसी) यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.