शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानातील सरकारी गोशाळेत ५०० गायींचा मृत्यू

By admin | Updated: August 6, 2016 18:51 IST

राजस्थानातील सरकारी गोशाळेत तब्बल 500 गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

जयपूर, दि. ६ - राजस्थानातील सरकारी गोशाळेत तब्बल 500 गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विश्व हिंदू परिषदेबरोबरच काँग्रेसने याबाबत आवाज उठविल्यानंतर राज्य सरकार जागे झाले असून, एका मंत्र्याने शनिवारी गोशाळेला भेट देऊन पाहणी केली.

जयपूरजवळील हिंगोनिया येथील गोशाळेत हा प्रकार घडला. काँग्रेसने काल हा प्रकार उघडकीस आणला. या गोशाळेत 100 गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणात उडी घेतली. हिंगोनिया गोशाळेत 100 नव्हे, तर 500 गायींचा मृत्यू झाला असून, निष्काळजीपणामुळे गायी मेल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) केला. काँग्रेसनेही असाच आरोप केला आहे. गोशाळेतील अस्वच्छतेमुळे गायी आजारी पडून मरत आहेत. आजारी गायींच्या सुटकेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही विहिंपने केली. टोंक रोडवर असलेली ही गोशाळा जयपूर महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येते. ही आशिया खंडातील सर्वोत्तम गोशाळा असल्याचे मानले जाते. 
राजस्थानचे नगरविकासमंत्री राजपाल सिंग शेखावत यांनी शनिवारी गोशाळेची पाहणी केली. महानगरपालिकेचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते. गोशाळेत साचलेला चिखल आणि शेणाची घाण तात्काळ काढण्याच्या सूचना त्यांनी तेथील व्यवस्थापनास केल्या. पाहणी अहवाल आपण मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना देऊ, असे शेखावत यांनी सांगितले. तत्पूर्वी काल विधिमंडळ कामकाज मंत्री राजेंद्र राठोड यांनी हिंगोनिया गोशाळेला भेट देऊन गायींच्या मृत्यूमागील कारणांची माहिती घेतली होती. 
मृत्यू पावलेल्या गायी आजारी होत्या. अस्वच्छतेमुळे एकही गाय मेलेली नाही, असा दावा राज्य सरकारने केला आहे. गोशाळेतील डॉक्टरांनी सांगितले की, गेल्या दहा दिवसांपासून दररोज सुमारे 50 गायी मरत आहेत. बहुतांश गायी उपासमारीने मेल्या असाव्यात असे दिसते. गोशाळेतील प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हरेंद्र सिंग यांनी सांगितले की, गोशाळेत दररोज 35 ते 38 गायी मरतात. यातील बहुतांश गायी भटक्या आणि आजारी असतात. अनेक गायींना अपघात झालेला असतो. आजारी गायी चारा खात नाही. 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विरोधी पक्षनेते रामेश्वर डुडी, विश्व हिंदु परिष आणि बजरंग दलाच्या नेत्यांनी वसुंधरा राजे सरकारवर टीका केली आहे.