शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

राजस्थानातील सरकारी गोशाळेत ५०० गायींचा मृत्यू

By admin | Updated: August 6, 2016 18:51 IST

राजस्थानातील सरकारी गोशाळेत तब्बल 500 गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

जयपूर, दि. ६ - राजस्थानातील सरकारी गोशाळेत तब्बल 500 गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विश्व हिंदू परिषदेबरोबरच काँग्रेसने याबाबत आवाज उठविल्यानंतर राज्य सरकार जागे झाले असून, एका मंत्र्याने शनिवारी गोशाळेला भेट देऊन पाहणी केली.

जयपूरजवळील हिंगोनिया येथील गोशाळेत हा प्रकार घडला. काँग्रेसने काल हा प्रकार उघडकीस आणला. या गोशाळेत 100 गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणात उडी घेतली. हिंगोनिया गोशाळेत 100 नव्हे, तर 500 गायींचा मृत्यू झाला असून, निष्काळजीपणामुळे गायी मेल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) केला. काँग्रेसनेही असाच आरोप केला आहे. गोशाळेतील अस्वच्छतेमुळे गायी आजारी पडून मरत आहेत. आजारी गायींच्या सुटकेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही विहिंपने केली. टोंक रोडवर असलेली ही गोशाळा जयपूर महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येते. ही आशिया खंडातील सर्वोत्तम गोशाळा असल्याचे मानले जाते. 
राजस्थानचे नगरविकासमंत्री राजपाल सिंग शेखावत यांनी शनिवारी गोशाळेची पाहणी केली. महानगरपालिकेचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते. गोशाळेत साचलेला चिखल आणि शेणाची घाण तात्काळ काढण्याच्या सूचना त्यांनी तेथील व्यवस्थापनास केल्या. पाहणी अहवाल आपण मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना देऊ, असे शेखावत यांनी सांगितले. तत्पूर्वी काल विधिमंडळ कामकाज मंत्री राजेंद्र राठोड यांनी हिंगोनिया गोशाळेला भेट देऊन गायींच्या मृत्यूमागील कारणांची माहिती घेतली होती. 
मृत्यू पावलेल्या गायी आजारी होत्या. अस्वच्छतेमुळे एकही गाय मेलेली नाही, असा दावा राज्य सरकारने केला आहे. गोशाळेतील डॉक्टरांनी सांगितले की, गेल्या दहा दिवसांपासून दररोज सुमारे 50 गायी मरत आहेत. बहुतांश गायी उपासमारीने मेल्या असाव्यात असे दिसते. गोशाळेतील प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हरेंद्र सिंग यांनी सांगितले की, गोशाळेत दररोज 35 ते 38 गायी मरतात. यातील बहुतांश गायी भटक्या आणि आजारी असतात. अनेक गायींना अपघात झालेला असतो. आजारी गायी चारा खात नाही. 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विरोधी पक्षनेते रामेश्वर डुडी, विश्व हिंदु परिष आणि बजरंग दलाच्या नेत्यांनी वसुंधरा राजे सरकारवर टीका केली आहे.