शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
3
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
4
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
5
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
6
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
7
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
8
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
9
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
10
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
11
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
12
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
13
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
14
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?
16
"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा
17
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
18
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
19
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
20
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."

राजस्थानातील सरकारी गोशाळेत ५०० गायींचा मृत्यू

By admin | Updated: August 6, 2016 18:51 IST

राजस्थानातील सरकारी गोशाळेत तब्बल 500 गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

जयपूर, दि. ६ - राजस्थानातील सरकारी गोशाळेत तब्बल 500 गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विश्व हिंदू परिषदेबरोबरच काँग्रेसने याबाबत आवाज उठविल्यानंतर राज्य सरकार जागे झाले असून, एका मंत्र्याने शनिवारी गोशाळेला भेट देऊन पाहणी केली.

जयपूरजवळील हिंगोनिया येथील गोशाळेत हा प्रकार घडला. काँग्रेसने काल हा प्रकार उघडकीस आणला. या गोशाळेत 100 गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणात उडी घेतली. हिंगोनिया गोशाळेत 100 नव्हे, तर 500 गायींचा मृत्यू झाला असून, निष्काळजीपणामुळे गायी मेल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) केला. काँग्रेसनेही असाच आरोप केला आहे. गोशाळेतील अस्वच्छतेमुळे गायी आजारी पडून मरत आहेत. आजारी गायींच्या सुटकेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही विहिंपने केली. टोंक रोडवर असलेली ही गोशाळा जयपूर महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येते. ही आशिया खंडातील सर्वोत्तम गोशाळा असल्याचे मानले जाते. 
राजस्थानचे नगरविकासमंत्री राजपाल सिंग शेखावत यांनी शनिवारी गोशाळेची पाहणी केली. महानगरपालिकेचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते. गोशाळेत साचलेला चिखल आणि शेणाची घाण तात्काळ काढण्याच्या सूचना त्यांनी तेथील व्यवस्थापनास केल्या. पाहणी अहवाल आपण मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना देऊ, असे शेखावत यांनी सांगितले. तत्पूर्वी काल विधिमंडळ कामकाज मंत्री राजेंद्र राठोड यांनी हिंगोनिया गोशाळेला भेट देऊन गायींच्या मृत्यूमागील कारणांची माहिती घेतली होती. 
मृत्यू पावलेल्या गायी आजारी होत्या. अस्वच्छतेमुळे एकही गाय मेलेली नाही, असा दावा राज्य सरकारने केला आहे. गोशाळेतील डॉक्टरांनी सांगितले की, गेल्या दहा दिवसांपासून दररोज सुमारे 50 गायी मरत आहेत. बहुतांश गायी उपासमारीने मेल्या असाव्यात असे दिसते. गोशाळेतील प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हरेंद्र सिंग यांनी सांगितले की, गोशाळेत दररोज 35 ते 38 गायी मरतात. यातील बहुतांश गायी भटक्या आणि आजारी असतात. अनेक गायींना अपघात झालेला असतो. आजारी गायी चारा खात नाही. 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विरोधी पक्षनेते रामेश्वर डुडी, विश्व हिंदु परिष आणि बजरंग दलाच्या नेत्यांनी वसुंधरा राजे सरकारवर टीका केली आहे.