शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानातील सरकारी गोशाळेत ५०० गायींचा मृत्यू

By admin | Updated: August 6, 2016 18:51 IST

राजस्थानातील सरकारी गोशाळेत तब्बल 500 गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

जयपूर, दि. ६ - राजस्थानातील सरकारी गोशाळेत तब्बल 500 गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विश्व हिंदू परिषदेबरोबरच काँग्रेसने याबाबत आवाज उठविल्यानंतर राज्य सरकार जागे झाले असून, एका मंत्र्याने शनिवारी गोशाळेला भेट देऊन पाहणी केली.

जयपूरजवळील हिंगोनिया येथील गोशाळेत हा प्रकार घडला. काँग्रेसने काल हा प्रकार उघडकीस आणला. या गोशाळेत 100 गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणात उडी घेतली. हिंगोनिया गोशाळेत 100 नव्हे, तर 500 गायींचा मृत्यू झाला असून, निष्काळजीपणामुळे गायी मेल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) केला. काँग्रेसनेही असाच आरोप केला आहे. गोशाळेतील अस्वच्छतेमुळे गायी आजारी पडून मरत आहेत. आजारी गायींच्या सुटकेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही विहिंपने केली. टोंक रोडवर असलेली ही गोशाळा जयपूर महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येते. ही आशिया खंडातील सर्वोत्तम गोशाळा असल्याचे मानले जाते. 
राजस्थानचे नगरविकासमंत्री राजपाल सिंग शेखावत यांनी शनिवारी गोशाळेची पाहणी केली. महानगरपालिकेचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते. गोशाळेत साचलेला चिखल आणि शेणाची घाण तात्काळ काढण्याच्या सूचना त्यांनी तेथील व्यवस्थापनास केल्या. पाहणी अहवाल आपण मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना देऊ, असे शेखावत यांनी सांगितले. तत्पूर्वी काल विधिमंडळ कामकाज मंत्री राजेंद्र राठोड यांनी हिंगोनिया गोशाळेला भेट देऊन गायींच्या मृत्यूमागील कारणांची माहिती घेतली होती. 
मृत्यू पावलेल्या गायी आजारी होत्या. अस्वच्छतेमुळे एकही गाय मेलेली नाही, असा दावा राज्य सरकारने केला आहे. गोशाळेतील डॉक्टरांनी सांगितले की, गेल्या दहा दिवसांपासून दररोज सुमारे 50 गायी मरत आहेत. बहुतांश गायी उपासमारीने मेल्या असाव्यात असे दिसते. गोशाळेतील प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हरेंद्र सिंग यांनी सांगितले की, गोशाळेत दररोज 35 ते 38 गायी मरतात. यातील बहुतांश गायी भटक्या आणि आजारी असतात. अनेक गायींना अपघात झालेला असतो. आजारी गायी चारा खात नाही. 
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विरोधी पक्षनेते रामेश्वर डुडी, विश्व हिंदु परिष आणि बजरंग दलाच्या नेत्यांनी वसुंधरा राजे सरकारवर टीका केली आहे.