शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
5
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
6
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
7
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
8
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
9
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
10
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
11
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
12
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
13
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
14
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
15
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
16
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
17
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
18
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
19
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
20
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...

एका वर्षात 50 टक्के भारतीयांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिली लाच, सर्वेक्षणातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 9:17 AM

गेल्या वर्षभरात दर १० पैकी ५ भारतीयांनी त्यांची कामं पूर्ण करून घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली आहे. एका ऑनलाईन सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे गेल्या वर्षभरात दर १० पैकी ५ भारतीयांनी त्यांची कामं पूर्ण करून घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली आहे. एका ऑनलाईन सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात दर १० पैकी ८ लोकांनी पोलीस, पालिकेच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याची कबुली दिली आहे.

नवी दिल्ली- गेल्या वर्षभरात दर १० पैकी ५ भारतीयांनी त्यांची कामं पूर्ण करून घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली आहे. एका ऑनलाईन सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात दर १० पैकी ८ लोकांनी पोलीस, पालिकेच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याची कबुली दिली आहे. याशिवाय मालमत्ता नोंदणी आणि व्हॅटसाठी लहान-मोठी लाच देणाऱ्यांचं प्रमाणदेखील ८० टक्के इतकं आहे.

लोकल सर्कल या वेबसाईटने देशातील भ्रष्टाचाराच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वेक्षण केलं होतं. यासाठी देशातील २०० पेक्षा अधिक शहरांमधून ऑनलाईन माहिती गोळा केली असल्याचा दावा वेबासाईटने केला. यामध्ये सुमारे १ लाखापेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतल्याची माहितीही या वेबसाईटने दिली आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना भ्रष्टाचाराबद्दल ८ प्रश्न विचारण्यात आले होते.या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २५ टक्के लोकांनी आतापर्यंत अनेकदा लाच दिल्याचं सांगितलं. तर २० टक्के लोकांनी गेल्या वर्षभरात त्यांना एक किंवा दोनवेळा लाच द्यावी लागल्याचं म्हटलं. भविष्यनिर्वाह निधी, आयकर, सेवा कर आणि रेल्वेशी संबंधित प्रकरणांमध्ये लाच द्यावी लागल्याची कबुली देणाऱ्यांचं प्रमाण ९ टक्के असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. दुसरीकडे, फक्त लाच दिल्यानेच काम होऊ शकतं, असं मानणाऱ्यांचं प्रमाण एक तृतीयांश इतकं आहे. लाच न दिल्यास आपलं काम अडकेल, असं मानणाऱ्या लोकांचं प्रमाण २० टक्के आहे. राज्य आणि स्थानिक प्रशासनाने लाचखोरी कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरात कोणतीही पावलं उचलली नाहीत, असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या आर्ध्याहून अधिक जणांनी व्यक्त केलं. 

लोकल सर्कलने केलेल्या सर्वेक्षणातून देशातील भ्रष्टाचार अजूनही कमी झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे, या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४२ टक्के लोकांनी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी उचलण्यात आलेली पावलं फार प्रभावी नसल्याचं म्हंटलं. भ्रष्टाचाराची तक्रार करणं अतिशय कठीण काम असल्याचं अनेकांचं मत आहे. लाचखोरीची तक्रार दाखल करण्यासाठी राज्य सरकारांकडून सुरु करण्यात आलेल्या हॉटलाईन व्यवस्थित काम करत करतात असं फक्त 9 टक्के लोकांनी म्हंटलं आहे.