शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

‘आयुष्यमान भारत’साठी हवेत ५ लाख डॉक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:54 IST

गरिबांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची ‘आयुष्यमान भारत’ योजना तडीस नेण्यासाठी देशाला ५ लाख डॉक्टरांची गरज आहे. त्यासाठी प्रसंगी विदेशात राहणाऱ्या भारतीय डॉक्टरांना पाचारण केले जाईल

मुंबई : गरिबांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची ‘आयुष्यमान भारत’ योजना तडीस नेण्यासाठी देशाला ५ लाख डॉक्टरांची गरज आहे. त्यासाठी प्रसंगी विदेशात राहणाऱ्या भारतीय डॉक्टरांना पाचारण केले जाईल, असे निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल यांनी येथे सांगितले.डॉ. पॉल यांनी शनिवारी मुंबईत भारतीय उद्योग महासंघातर्फे (सीआयआय) आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. विकसित देशांमध्ये प्रति लाख स्पेशालिस्ट डॉक्टरांची संख्या ५० आहे. भारतात हा आकडा फक्त ५.३ आहे. ‘आयुष्यमान भारत’समोर हेच सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.देशातील आजवरच्या सर्व सरकारी वैद्यकीय विमा योजना काही ना काही कारणाने अयशस्वी ठरल्या. त्या उद्दिष्ट पूर्णच करू शकल्या नाहीत. आता मात्र आयुष्यमान योजनेत ४० टक्के गरिबांना सामावून घेतले जाईल, असे ते म्हणाले.उपचारांची १३00 पॅकेजेसया योजनेतील वैद्यकीय उपचारांची १३०० पॅकेजेस केंद्राने तयार केली आहेत. उपचारांसाठीचे दरही निश्चित आहेत. देशभर एकच दर ठेवण्याचा विचार सुरू आहे.योजनेसाठी छोट्या शहरांमधील इस्पितळांची गरज आहे. मोठी इस्पितळेही लागतीलच. पण वैद्यकीय क्षेत्राने दरवेळेस केवळ नफेखोरीचा विचार करू नये, असे आवाहन डॉ. पॉल यांनी केले.लवकरच निविदाया योजनेत वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्वांनीच सहभागी होणे आवश्यक आहे. याची निविदा लवकरच काढली जाईल. योजना राज्यांनी राबवायची आहे. त्यामुळे राज्यांना गरज भासल्यास केंद्राच्या धर्तीवरच स्वतंत्र निविदा त्यांना काढता येईल, असे डॉ. पॉल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.या योजनेतील लाभार्थींना वेगळी नोंदणी करावी लागणार नाही. कुठल्या क्षेत्रातील कोणाचा योजनेत समावेश असेल, याची यादी केंद्राने तयार केली आहे. देशात अशी १० कोटी ७४ लाख कुटुंबे आहेत, असे डॉ. पॉल म्हणाले.