शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या गोळीबारात ५ भारतीय नागरिक ठार

By admin | Updated: October 6, 2014 09:50 IST

जम्मू काश्मीरमधील अरनिया, आरएस पुरा सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने गोळीबारात सीमारेषेवरील गावात राहणा-या पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. ६ - जम्मू काश्मीरमधील अरनिया, आरएस पुरा सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने गोळीबारात सीमारेषेवरील गावात राहणा-या पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ३० नागरिक या गोळीबारात जखमी झाले असून भारतीय सैन्यानेही पाक सैन्याच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 
रविवारी रात्री पाकिस्तान रेंजर्सने नियंत्रण रेषेवरील पिट्टल, चेनाज, नारायणपूरसह सुमारे १५ भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पाक सैन्याने भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या चौक्यांसोबतच सीमा रेषेवरील गावांवरही गोळीबार केला. ईद असल्याने सुरुवातीला भारतीय सैन्याने सावध भूमिका घेतली. मात्र पाकने गोळीबार सुरुच ठेवल्याने अखेरीस भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले. पाक सैन्याने निवासी भागालाही लक्ष्य केल्याने यात ५ भारतीय नागरिक ठार झाले तर ३० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळपर्यंत पाक सैन्याकडून गोळीबार सुरुच होता.  १ ऑक्टोबरपासून पाकने तब्बल ११ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.  
एकीकडे सीमा रेषेवर गोळीबार सुरु असतानाच सीमा रेषेवरील तंगधार सेक्टर येथे घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्याने उधळून लावला. तंगधार सेक्टरमधून भारतात घुसखोरी करणा-या तीन दहशतवाद्यांना भारतीय सैन्याच्या जवानांनी कंठस्नान घातले. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.