शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशात ५.६ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत; कोरोना काळात बसला सर्वाधिक फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 09:26 IST

ग्रामीण भागातील गरिबीत घट; जागतिक बँकेचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना साथीच्या महामारीमुळे २०२० मध्ये सर्व उद्योगधंदे बंद झाल्याने कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे भारतातील तब्बल ५.६ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत ओढले गेले, असे जागतिक बँकेने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे. 

थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीचा हवाला जागतिक बँकेने यासाठी दिला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अद्याप निश्चित झालेले नाहीत; परंतु जागतिक बँकेने ‘गरिबी आणि सर्वांची समृद्धी २०२२’ या शीर्षकाच्या अहवालात जगातील गरिबीचा अंदाज घेण्यासाठी या आकडेवारीचा वापर केला आहे. भारत गेल्या काही वर्षांत जागतिक आणि प्रादेशिक गरिबीच्या अंदाजांमधील अंतर भरण्यासाठी आवश्यक असणारा डेटा प्रकाशित करीत नसल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सादर केलेल्या अंदाजापेक्षा भारतात गरिबीचे प्रमाण अधिक आहे. ‘आयएमएफ’ने २०२०मध्ये २.३ कोटी भारतीय गरिबीत गेल्याचे म्हटले होते. राष्ट्रीय खात्यांवर आधारित असलेला आयएमएफचा अहवाल अर्थशास्त्रज्ञ सुरजित भल्ला, करण भसीन आणि अरविंद विरमानी यांनी लिहिला आहे. २०१८मध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देणारे भल्ला सध्या ‘आयएमएफ’मध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक आहेत.

सध्या किती भारतीय गरीब? 

यापूर्वीच्या जागतिक बँकेच्या आधीच्या अंदाजानुसार २०१७ मध्ये भारतातील एकूण लोकसंख्येपैकी १०.४ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती. त्यांचा प्रतिदिन पगार केवळ १५५ रुपये (१.९ डॉलर) होता. ताज्या अहवालानुसार, २०१७ मध्ये देशातील १३.६ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली म्हणजे गरिबीत जीवन जगत होते.

किती वाढला गरिबीचा दर? 

कोरोना साथीच्या रोगाने जगात अत्यंत गरिबीचा दर २०२० मध्ये अंदाजे ९.३ टक्क्यांपर्यंत वाढविला, जो २०१९ मध्ये ८.४ टक्के होता. २०११ पासून भारतात विशेषतः ग्रामीण भागात गरिबीत घट झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.

शहरात, गावाकडे किती गरिबी? 

सन २०१९-२०मध्ये भारतातील १० टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगत होती, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. ग्रामीण भागात १२ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात, तर ६ टक्के शहरी लोक गरिबीत जीवन जगत होते.

सरकार कुठे कमी पडले? 

सरकारला गरजूंपर्यंत पोहोचणे कठीण झाले असल्याने कोरोना महामारीमुळे गरिबांची स्थिती आणखी बिकट झाली असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. केंद्र सरकार कोरोना महामारीच्या काळात १५% ग्रामीण जनतेपर्यंत, तर ३१% जनतेपर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरले, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

सर्वाधिक गरीब कोण? 

आफ्रिकन देश (सर्वांत गरीब) दक्षिण आशिया : भारत, पाकिस्तान, बांगलादेश ब्राझील । इंडोनेशिया

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार