शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

देशात ५.६ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत; कोरोना काळात बसला सर्वाधिक फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 09:26 IST

ग्रामीण भागातील गरिबीत घट; जागतिक बँकेचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना साथीच्या महामारीमुळे २०२० मध्ये सर्व उद्योगधंदे बंद झाल्याने कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे भारतातील तब्बल ५.६ कोटी नागरिक गरिबीच्या खाईत ओढले गेले, असे जागतिक बँकेने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे. 

थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीचा हवाला जागतिक बँकेने यासाठी दिला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अद्याप निश्चित झालेले नाहीत; परंतु जागतिक बँकेने ‘गरिबी आणि सर्वांची समृद्धी २०२२’ या शीर्षकाच्या अहवालात जगातील गरिबीचा अंदाज घेण्यासाठी या आकडेवारीचा वापर केला आहे. भारत गेल्या काही वर्षांत जागतिक आणि प्रादेशिक गरिबीच्या अंदाजांमधील अंतर भरण्यासाठी आवश्यक असणारा डेटा प्रकाशित करीत नसल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये सादर केलेल्या अंदाजापेक्षा भारतात गरिबीचे प्रमाण अधिक आहे. ‘आयएमएफ’ने २०२०मध्ये २.३ कोटी भारतीय गरिबीत गेल्याचे म्हटले होते. राष्ट्रीय खात्यांवर आधारित असलेला आयएमएफचा अहवाल अर्थशास्त्रज्ञ सुरजित भल्ला, करण भसीन आणि अरविंद विरमानी यांनी लिहिला आहे. २०१८मध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा देणारे भल्ला सध्या ‘आयएमएफ’मध्ये भारतासाठी कार्यकारी संचालक आहेत.

सध्या किती भारतीय गरीब? 

यापूर्वीच्या जागतिक बँकेच्या आधीच्या अंदाजानुसार २०१७ मध्ये भारतातील एकूण लोकसंख्येपैकी १०.४ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती. त्यांचा प्रतिदिन पगार केवळ १५५ रुपये (१.९ डॉलर) होता. ताज्या अहवालानुसार, २०१७ मध्ये देशातील १३.६ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली म्हणजे गरिबीत जीवन जगत होते.

किती वाढला गरिबीचा दर? 

कोरोना साथीच्या रोगाने जगात अत्यंत गरिबीचा दर २०२० मध्ये अंदाजे ९.३ टक्क्यांपर्यंत वाढविला, जो २०१९ मध्ये ८.४ टक्के होता. २०११ पासून भारतात विशेषतः ग्रामीण भागात गरिबीत घट झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.

शहरात, गावाकडे किती गरिबी? 

सन २०१९-२०मध्ये भारतातील १० टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगत होती, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. ग्रामीण भागात १२ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात, तर ६ टक्के शहरी लोक गरिबीत जीवन जगत होते.

सरकार कुठे कमी पडले? 

सरकारला गरजूंपर्यंत पोहोचणे कठीण झाले असल्याने कोरोना महामारीमुळे गरिबांची स्थिती आणखी बिकट झाली असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. केंद्र सरकार कोरोना महामारीच्या काळात १५% ग्रामीण जनतेपर्यंत, तर ३१% जनतेपर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरले, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

सर्वाधिक गरीब कोण? 

आफ्रिकन देश (सर्वांत गरीब) दक्षिण आशिया : भारत, पाकिस्तान, बांगलादेश ब्राझील । इंडोनेशिया

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार