शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जि.प.शाळांमध्ये शिक्षकांची ४८३ पदे रिक्त

By admin | Updated: July 23, 2016 00:02 IST

जळगाव : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे डिजीटल शिक्षण, इ-लर्निंग, आयएसओ असे उपक्रम राबविण्याचा गवगवा सुरू आहे. दुसरीकडे मात्र आदिवासी, सिमांत भागातील शाळांमध्ये शिक्षक रूजू व्हायला तयार नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ४८३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

जळगाव : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे डिजीटल शिक्षण, इ-लर्निंग, आयएसओ असे उपक्रम राबविण्याचा गवगवा सुरू आहे. दुसरीकडे मात्र आदिवासी, सिमांत भागातील शाळांमध्ये शिक्षक रूजू व्हायला तयार नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ४८३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
ही पदे रिक्त असल्याने यंदा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून २०० शिक्षक इतर जिल्ह्यांमधून घेण्यात आले. परंतु यापैकी १०० शिक्षकदेखील अजून रूजू झालेले नाहीत. अलीकडेच मुक्ताईनगर तालुक्यात आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून नियुक्त केलेल्या चार शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

आजी माजी सभापतींच्या भागातील शाळांना ठोकले कुलूप
जि.प.शिक्षण समितीचे सभापती सुरेश धनके यांच्या गावानजीकच्या मोरझिरा या उर्दू जि.प.शाळेला शिक्षक नसल्याने कुलूप ठोकण्यात आले. यापूर्वी माजी शिक्षण सभापती व जि.प.सदस्य हर्षल पाटील यांच्या सातोद गावानजीकच्या कोळवद शाळेत एक शिक्षक येत नसल्याने कुलूप ठोकले होते.
उर्दू शिक्षक तर मिळतच नाहीत. यावल, रावेर, चोपडा व जामनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये उर्दू शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शैक्षणिक विकासाला खीळ बसत असल्याने जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती सुरेश धनके यांनी राज्याचे शिक्षणमंत्री, जलसंपदामंत्री व माजी महसूलमंत्री यांना पत्र दिले आहे.
मध्य प्रदेेशच्या सिमेलगतच्या जि.प.च्या शाळांमध्ये शिकविण्यासाठी जायला शिक्षक तयार नाहीत.
जि.प.शाळांची स्थिती
शाळांची संख्या- १८४३
शिक्षकांची संख्या सात हजार ११३
रिक्त शिक्षकांची संख्या- मराठी शाळा- २६१
उर्दू शाळा- २२२

अलीकडेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तपासणी मोहीम महसूल विभागातर्फे राबविण्यात आली. त्यात अनेक शाळांमध्ये पोषण आहार, गणवेश वाटप न करणे व शिक्षक नसणे असे प्रकार आढळले आहेत. या तपासणीमुळे जि.प.च्या गुणवत्ता विकासाचा दावा फोल ठरतो. हेदेखील स्पष्ट झाले आहे.


जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त पदे भरण्याची कार्यवाही शासनातर्फे केली जाईल. आपल्याकडून त्याबाबत शासनाला माहिती सादर केली जाते. भरतीचा अधिकार शासनाचा आहे.
-आस्तिककुमार पांडेय, सीईओ, जि.प.

जिल्हा परिषदेच्या उर्दू आणि मराठी शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. काही ठिकाणी पटसंख्या कमी असली तरी अनेक शाळांध्ये स्थिती चांगली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीबाबत शिक्षणमंत्री, जलसंपदामंत्री आदींना पत्र दिले आहे.
-सुरेश धनके, सभापती, जि.प. शिक्षण समिती