शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

जि.प.शाळांमध्ये शिक्षकांची ४८३ पदे रिक्त

By admin | Updated: July 23, 2016 00:02 IST

जळगाव : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे डिजीटल शिक्षण, इ-लर्निंग, आयएसओ असे उपक्रम राबविण्याचा गवगवा सुरू आहे. दुसरीकडे मात्र आदिवासी, सिमांत भागातील शाळांमध्ये शिक्षक रूजू व्हायला तयार नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ४८३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

जळगाव : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे डिजीटल शिक्षण, इ-लर्निंग, आयएसओ असे उपक्रम राबविण्याचा गवगवा सुरू आहे. दुसरीकडे मात्र आदिवासी, सिमांत भागातील शाळांमध्ये शिक्षक रूजू व्हायला तयार नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ४८३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
ही पदे रिक्त असल्याने यंदा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून २०० शिक्षक इतर जिल्ह्यांमधून घेण्यात आले. परंतु यापैकी १०० शिक्षकदेखील अजून रूजू झालेले नाहीत. अलीकडेच मुक्ताईनगर तालुक्यात आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून नियुक्त केलेल्या चार शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

आजी माजी सभापतींच्या भागातील शाळांना ठोकले कुलूप
जि.प.शिक्षण समितीचे सभापती सुरेश धनके यांच्या गावानजीकच्या मोरझिरा या उर्दू जि.प.शाळेला शिक्षक नसल्याने कुलूप ठोकण्यात आले. यापूर्वी माजी शिक्षण सभापती व जि.प.सदस्य हर्षल पाटील यांच्या सातोद गावानजीकच्या कोळवद शाळेत एक शिक्षक येत नसल्याने कुलूप ठोकले होते.
उर्दू शिक्षक तर मिळतच नाहीत. यावल, रावेर, चोपडा व जामनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये उर्दू शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शैक्षणिक विकासाला खीळ बसत असल्याने जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती सुरेश धनके यांनी राज्याचे शिक्षणमंत्री, जलसंपदामंत्री व माजी महसूलमंत्री यांना पत्र दिले आहे.
मध्य प्रदेेशच्या सिमेलगतच्या जि.प.च्या शाळांमध्ये शिकविण्यासाठी जायला शिक्षक तयार नाहीत.
जि.प.शाळांची स्थिती
शाळांची संख्या- १८४३
शिक्षकांची संख्या सात हजार ११३
रिक्त शिक्षकांची संख्या- मराठी शाळा- २६१
उर्दू शाळा- २२२

अलीकडेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तपासणी मोहीम महसूल विभागातर्फे राबविण्यात आली. त्यात अनेक शाळांमध्ये पोषण आहार, गणवेश वाटप न करणे व शिक्षक नसणे असे प्रकार आढळले आहेत. या तपासणीमुळे जि.प.च्या गुणवत्ता विकासाचा दावा फोल ठरतो. हेदेखील स्पष्ट झाले आहे.


जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त पदे भरण्याची कार्यवाही शासनातर्फे केली जाईल. आपल्याकडून त्याबाबत शासनाला माहिती सादर केली जाते. भरतीचा अधिकार शासनाचा आहे.
-आस्तिककुमार पांडेय, सीईओ, जि.प.

जिल्हा परिषदेच्या उर्दू आणि मराठी शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. काही ठिकाणी पटसंख्या कमी असली तरी अनेक शाळांध्ये स्थिती चांगली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीबाबत शिक्षणमंत्री, जलसंपदामंत्री आदींना पत्र दिले आहे.
-सुरेश धनके, सभापती, जि.प. शिक्षण समिती