शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगा योजनेसाठी 48 हजार कोटी - जेटली

By admin | Updated: February 1, 2017 11:55 IST

मनरेगा योजनेसाठी अर्थसंकल्पातून 48 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 1 - मनरेगा योजनेसाठी अर्थसंकल्पातून 48 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी  4878  कोटींची तरतूद करण्यात आली असून 2018 पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे उद्देश असल्याचे जेटलींनी सांगितले. 
 
2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद, 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शिवाय ग्रामविकासासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून ग्रामी भागातील विजेसाठी 4500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 
 
दरम्यान, बेघर आणि कच्च्या घरांत राहणा-यांसाठी 2019  पर्यंत 1 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून यासंदर्भात 15 हजार कोटींवरुन 23 हजार कोटींपर्यंत तरतूद वाढवण्यात आली आहे.  
 
महत्त्वाचे मुद्दे
2019 पर्यंत 50 हजार ग्रामपंचायती गरिबीमुक्त करणार 
मनरेगाच्या माध्यमातून यंदा 5 लाख तलाव बांधण्याचे लक्ष्य 
बेघर आणि कच्च्या घरांत राहणा-यासाठी 2019 पर्यंत 1 कोटी घरे बांधणार
पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद.
दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी 4818 कोटींची तरतूद. 2018  पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचणार.
ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे.
 2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद, 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली.