शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
2
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
3
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
4
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
6
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
7
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
8
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
9
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
10
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
11
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
12
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
13
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
14
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
15
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
16
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
17
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
18
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
19
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
20
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

६ वर्षांत विजेच्या धक्क्याने ४७४ हत्तींचा मृत्यू; प्राण्यांची अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 08:45 IST

२०१४ ते २०२० चा कालावधी; प्राण्यांची अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे धाव

कोची : २०१४ ते २०२० या कालावधीत ४७४ हत्ती विजेच्या धक्क्याने मरण पावले. अशा सर्वाधिक घटना आसाममध्ये घडल्या आहेत. त्यानंतर ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांचा क्रमांक लागतो. मानव व वन्यप्राणी यांच्यातील वाढता संघर्ष, जंगलांवर माणसाने केलेले आक्रमण यांसारख्या कारणांमुळे इतर प्राण्यांप्रमाणेच रानटी हत्तींचे अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे पाय वळत आहेत. त्यांना अटकाव करण्यासाठी वीजप्रवाह सुरू असलेल्या तारांचे कुंपण शेती, मळ्याला घातले जाते. तिथे विजेचा झटका लागून हत्ती मरण पावण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. 

जगातील आशियाई हत्तींपैकी निम्मे म्हणजे २७,३०० हत्ती एकट्या भारतामध्ये आहेत. विजेचा धक्का लागून मरण पावणाऱ्या हत्तींबाबत माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय वन व पर्यावरण खात्याने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, पूर्वी हत्तींची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जायची. पण आता विजेच्या तारांच्या धक्क्याने हत्ती मरण पावण्याचे प्रमाण वाढले आहे. 

केंद्रीय वने व पर्यावरण खात्याने म्हटले आहे की, २०१४ ते २०२० या कालावधीत ४७४ हत्ती विजेच्या धक्क्याने मरण पावले. अशा सर्वाधिक घटना आसाममध्ये घडल्या आहेत. तिथे ९० हत्ती मरण पावले. त्यानंतर ओडिशामध्ये ७३, तामिळनाडूमध्ये ६८, कर्नाटकमध्ये ६५, केरळात २४ हत्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.  गेल्या काही वर्षांत माणूस व प्राणी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यातच ग्लोबल वॉर्मिंगसारख्या घटकांचीही भर पडली आहे. केंद्र सरकारने वनव्यवस्थापन धोरणाचा फेरआढावा घ्यावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे.  (वृत्तसंस्था)

संघर्ष आणखी तीव्र होणार

आशियाई हत्ती या विषयाचे तज्ज्ञ डॉ. पी. एस. इसा म्हणाले की, जंगलांवर माणसाने आक्रमण केले आहे. ज्या ठिकाणी जंगलात पुरेसे अन्न मिळत नाही, तिथे हत्ती अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे आपला मोहरा वळवितात. माणूस व वन्यप्राण्यांमधील  संघर्ष भविष्यात आणखी तीव्र होण्याची लक्षणे आहेत.

टॅग्स :Keralaकेरळ