शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

६ वर्षांत विजेच्या धक्क्याने ४७४ हत्तींचा मृत्यू; प्राण्यांची अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 08:45 IST

२०१४ ते २०२० चा कालावधी; प्राण्यांची अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे धाव

कोची : २०१४ ते २०२० या कालावधीत ४७४ हत्ती विजेच्या धक्क्याने मरण पावले. अशा सर्वाधिक घटना आसाममध्ये घडल्या आहेत. त्यानंतर ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांचा क्रमांक लागतो. मानव व वन्यप्राणी यांच्यातील वाढता संघर्ष, जंगलांवर माणसाने केलेले आक्रमण यांसारख्या कारणांमुळे इतर प्राण्यांप्रमाणेच रानटी हत्तींचे अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे पाय वळत आहेत. त्यांना अटकाव करण्यासाठी वीजप्रवाह सुरू असलेल्या तारांचे कुंपण शेती, मळ्याला घातले जाते. तिथे विजेचा झटका लागून हत्ती मरण पावण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. 

जगातील आशियाई हत्तींपैकी निम्मे म्हणजे २७,३०० हत्ती एकट्या भारतामध्ये आहेत. विजेचा धक्का लागून मरण पावणाऱ्या हत्तींबाबत माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय वन व पर्यावरण खात्याने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, पूर्वी हत्तींची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जायची. पण आता विजेच्या तारांच्या धक्क्याने हत्ती मरण पावण्याचे प्रमाण वाढले आहे. 

केंद्रीय वने व पर्यावरण खात्याने म्हटले आहे की, २०१४ ते २०२० या कालावधीत ४७४ हत्ती विजेच्या धक्क्याने मरण पावले. अशा सर्वाधिक घटना आसाममध्ये घडल्या आहेत. तिथे ९० हत्ती मरण पावले. त्यानंतर ओडिशामध्ये ७३, तामिळनाडूमध्ये ६८, कर्नाटकमध्ये ६५, केरळात २४ हत्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.  गेल्या काही वर्षांत माणूस व प्राणी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यातच ग्लोबल वॉर्मिंगसारख्या घटकांचीही भर पडली आहे. केंद्र सरकारने वनव्यवस्थापन धोरणाचा फेरआढावा घ्यावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे.  (वृत्तसंस्था)

संघर्ष आणखी तीव्र होणार

आशियाई हत्ती या विषयाचे तज्ज्ञ डॉ. पी. एस. इसा म्हणाले की, जंगलांवर माणसाने आक्रमण केले आहे. ज्या ठिकाणी जंगलात पुरेसे अन्न मिळत नाही, तिथे हत्ती अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे आपला मोहरा वळवितात. माणूस व वन्यप्राण्यांमधील  संघर्ष भविष्यात आणखी तीव्र होण्याची लक्षणे आहेत.

टॅग्स :Keralaकेरळ