शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

६ वर्षांत विजेच्या धक्क्याने ४७४ हत्तींचा मृत्यू; प्राण्यांची अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 08:45 IST

२०१४ ते २०२० चा कालावधी; प्राण्यांची अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे धाव

कोची : २०१४ ते २०२० या कालावधीत ४७४ हत्ती विजेच्या धक्क्याने मरण पावले. अशा सर्वाधिक घटना आसाममध्ये घडल्या आहेत. त्यानंतर ओडिशा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांचा क्रमांक लागतो. मानव व वन्यप्राणी यांच्यातील वाढता संघर्ष, जंगलांवर माणसाने केलेले आक्रमण यांसारख्या कारणांमुळे इतर प्राण्यांप्रमाणेच रानटी हत्तींचे अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे पाय वळत आहेत. त्यांना अटकाव करण्यासाठी वीजप्रवाह सुरू असलेल्या तारांचे कुंपण शेती, मळ्याला घातले जाते. तिथे विजेचा झटका लागून हत्ती मरण पावण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. 

जगातील आशियाई हत्तींपैकी निम्मे म्हणजे २७,३०० हत्ती एकट्या भारतामध्ये आहेत. विजेचा धक्का लागून मरण पावणाऱ्या हत्तींबाबत माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय वन व पर्यावरण खात्याने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, पूर्वी हत्तींची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जायची. पण आता विजेच्या तारांच्या धक्क्याने हत्ती मरण पावण्याचे प्रमाण वाढले आहे. 

केंद्रीय वने व पर्यावरण खात्याने म्हटले आहे की, २०१४ ते २०२० या कालावधीत ४७४ हत्ती विजेच्या धक्क्याने मरण पावले. अशा सर्वाधिक घटना आसाममध्ये घडल्या आहेत. तिथे ९० हत्ती मरण पावले. त्यानंतर ओडिशामध्ये ७३, तामिळनाडूमध्ये ६८, कर्नाटकमध्ये ६५, केरळात २४ हत्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.  गेल्या काही वर्षांत माणूस व प्राणी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यातच ग्लोबल वॉर्मिंगसारख्या घटकांचीही भर पडली आहे. केंद्र सरकारने वनव्यवस्थापन धोरणाचा फेरआढावा घ्यावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे.  (वृत्तसंस्था)

संघर्ष आणखी तीव्र होणार

आशियाई हत्ती या विषयाचे तज्ज्ञ डॉ. पी. एस. इसा म्हणाले की, जंगलांवर माणसाने आक्रमण केले आहे. ज्या ठिकाणी जंगलात पुरेसे अन्न मिळत नाही, तिथे हत्ती अन्नासाठी मानवी वस्त्यांकडे आपला मोहरा वळवितात. माणूस व वन्यप्राण्यांमधील  संघर्ष भविष्यात आणखी तीव्र होण्याची लक्षणे आहेत.

टॅग्स :Keralaकेरळ