शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

४५ विमानतळे रद्द करण्याचे केंद्राचे संकेत

By admin | Updated: April 21, 2015 00:59 IST

देशाच्या नागरी भागात विकसित करण्यात येणाऱ्या सुमारे ४५ विमानतळांची बांधणी न करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले असून लवकरच या संदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल

मुंबई : देशाच्या नागरी भागात विकसित करण्यात येणाऱ्या सुमारे ४५ विमानतळांची बांधणी न करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले असून लवकरच या संदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल.मेट्रो आणि प्रथम श्रेणी शहरांप्रमाणेच देशाच्या द्वितीय श्रेणी शहरांतूनही विमान सेवा सुरू करण्यासाठी २०१३ मध्ये तत्कालिन संपुआ सरकारने ५० शहरांतून विमान सेवा सुरू करण्याची महत्वाची घोषणा केली होती. ५ विमानतळांचे प्रत्यक्ष काम ही सुरू झाले आहे. या विमानतळांना वगळून उर्वरित विमानतळांचे प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. यात कर्नाटक, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, ओडिशा या राज्यांतील प्रकल्पांचा समावेश आहे. रद्द होऊ घातलेल्या ४५ विमानतळांची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नव्या सरकारने विमानतळ कुठे असावे या निकषात बदल केले असून ज्या शहराची लोकसंख्या १० लाखांच्या वर आहे, अशाच ठिकाणी आर्थिक वैधता तपासून विमानतळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. संपुआ सरकारने ज्या शहरांची निवड केली होती त्यात १० लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याने आणि ती आर्थिकदृष्ट्या वैध नसल्याचे मोदी सरकारला जाणवल्याने येथील विमानतळ रद्द होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. (प्रतिनिधी)