शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

देशात रस्ते अपघातात ४०० नागरिक दररोज गमावतात जीव

By admin | Updated: April 21, 2016 11:06 IST

२०१५ साली रस्ते अपघातात दररोज सुमारे ४०० नागरिकांनी जाव गमावल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - जगभरात भारतातील रस्ते अतिशय धोकादायक मानले जातात. २०१५ साली यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. इतर वर्षांच्या तुलनेत २०१५ सालात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रमाणात ५ टक्के वाढ झाली असून हा आकडा १.४६ लाखांवर पोचला आहे. गेल्या वर्षी रस्ते अपघातात दररोज सुमारे ४०० नागरिकांनी जाव गमावल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, दर साडेतीन मिनिटांनी एक नागरिक अपघातात मृत्यूमुखी पडतो. 
हा आकडा म्हणजे सरकारसाठी धोक्याचा इशारा आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०२० पर्यंत रस्ते अपघातात जीव गमवाव्या लागणा-यांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य समोर ठेवले होते. 
विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातामुळे जीव गमवाव्या लागणा-यांची संख्या सर्वाधिक (१७,६६६) आहे, त्यामागोमाग तामिळनाडूचा (१५,६४२) नंबर लागतो. या यादीत महाराष्ट्र तिस-या (१३,२१२) क्रमांकावर असून राजस्थानमध्ये मृतांचा आकडा १०,५१० इतका असल्याचे समजते. 
दरम्यान मोठ्या राज्यातींल मृतांचा आकडा वाढत असतानाच, १० छोट्या राज्यांसह दिल्ली, चंदीगडसहित केंद्रशासित प्रदेशांमधील मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. आसाममध्ये हे प्रमाण सर्वात कमी आहे.