शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Earthquakes: दोन वर्षांत ४०० भूकंपाचे धक्के, भारतातील या ठिकाणी राहणं झालंय भयावह, भूगर्भात चाललंय तरी काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 14:38 IST

Earthquakes: गुजरातमधील अमरेली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये येथे तब्बल ४०० भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे.

गुजरातमधील अमरेली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये येथे तब्बल ४०० भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. भूकंपशास्त्राच्या भाषेत या प्रकाराला भूकंप स्वार्म म्हटलं जातं. स्वार्म म्हणजे भूकंपाच्या कमी तीव्रतेच्या धक्क्यांची मालिका असते. हे धक्के कमी वेळासाठी जाणवतात. मात्र ते अनेक दिवसांपर्यंत जाणवत असतात. अमरेली जिल्ह्यामध्ये असलेल्या मिटियाला गावातील ग्रामस्थांनी या भूकंपाच्या धक्क्यांचा एवढा धसका घेतला आहे की, आता ते खबरदारी म्हणून घराबाबेर झोपू लागले आहेत.

मिटियालामधील ग्रामस्थ मोहम्मद राठोड याने सांगितले की, या धक्क्यांच्या भीतीमुळे सरपंचांसह गावातील बहुतांश लोकांनी रात्री घराबाहेर झोपण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, गांधीनगर येथील भूकंप संशोधन संस्थेचे महासंचालक सुमेर चोप्रा यांनी सांगितले की, या भूकंपीय हालचालींचं कारण टेक्टॉनिक क्रम आणि जलीय भार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, गेली दोन वर्षे आणि दोन महिन्यांच्यादरम्यान, अमरेलीमध्ये ४०० सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामधील ८६ टक्के भूकंपांची तीव्रता ही दोनपेक्षा कमी होती. तर १३ टक्के भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ही दोन ते तीनच्या दरम्यान होती. केवळ पाच धक्क्यांची तीव्रता ही ३ पेक्षा अधिक होती. 

त्यांनी सांगितले की, बहुतांश भूकंपाचे धक्के हे लोकांना जाणवले नाहीत. तर त्यांची नोंद ही आमच्या यंत्रावर झाली. अमरोलीसह सौराष्ट्रचा बहुतांश भाग हा भूकंपीय क्षेत्र ३ अंतर्गत येतो. धोक्याच्या दृष्टीने हा भाग मध्यम धोक्याच्या श्रेणीत आहे. अमरेलीमध्ये फॉल्ट लाइन १० किमीपर्यंत आहे. तर शक्तिशाली भूकंपासाठी ही लाइन ६० ते ७० किमी असते. अमरेलीमध्ये सर्वाधिक ४.४ तीव्रतेचा भूकंप १३० वर्षांपूर्वी १८९१ मध्ये आला आहोत. तर सौराष्ट्र क्षेत्रातील सर्वात मोठा भूकंप हा जुनागडमध्ये २०११ मध्ये आला होता.

 या महिन्यामध्ये २३ फेब्रुवारीपासून ४८ तासांमध्ये अमरेलीच्या सावरकुंडला आणि खंबा तालुक्यामध्ये ३.१ ते ३.४ तीव्रतेचे भूकंपाचे चार धक्के नोंदवले गेले. त्यामुळे येथील रहिवासी चिंतीत आहेत. गुजरातमधील कच्छमध्ये २००१ मध्ये आलेल्या भूकंपामध्ये १९ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला होता. तर १.६७ लाख लोक जखमी झाले होते.  

टॅग्स :EarthquakeभूकंपGujaratगुजरात