शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

Earthquakes: दोन वर्षांत ४०० भूकंपाचे धक्के, भारतातील या ठिकाणी राहणं झालंय भयावह, भूगर्भात चाललंय तरी काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 14:38 IST

Earthquakes: गुजरातमधील अमरेली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये येथे तब्बल ४०० भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे.

गुजरातमधील अमरेली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये येथे तब्बल ४०० भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. भूकंपशास्त्राच्या भाषेत या प्रकाराला भूकंप स्वार्म म्हटलं जातं. स्वार्म म्हणजे भूकंपाच्या कमी तीव्रतेच्या धक्क्यांची मालिका असते. हे धक्के कमी वेळासाठी जाणवतात. मात्र ते अनेक दिवसांपर्यंत जाणवत असतात. अमरेली जिल्ह्यामध्ये असलेल्या मिटियाला गावातील ग्रामस्थांनी या भूकंपाच्या धक्क्यांचा एवढा धसका घेतला आहे की, आता ते खबरदारी म्हणून घराबाबेर झोपू लागले आहेत.

मिटियालामधील ग्रामस्थ मोहम्मद राठोड याने सांगितले की, या धक्क्यांच्या भीतीमुळे सरपंचांसह गावातील बहुतांश लोकांनी रात्री घराबाहेर झोपण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, गांधीनगर येथील भूकंप संशोधन संस्थेचे महासंचालक सुमेर चोप्रा यांनी सांगितले की, या भूकंपीय हालचालींचं कारण टेक्टॉनिक क्रम आणि जलीय भार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, गेली दोन वर्षे आणि दोन महिन्यांच्यादरम्यान, अमरेलीमध्ये ४०० सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामधील ८६ टक्के भूकंपांची तीव्रता ही दोनपेक्षा कमी होती. तर १३ टक्के भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ही दोन ते तीनच्या दरम्यान होती. केवळ पाच धक्क्यांची तीव्रता ही ३ पेक्षा अधिक होती. 

त्यांनी सांगितले की, बहुतांश भूकंपाचे धक्के हे लोकांना जाणवले नाहीत. तर त्यांची नोंद ही आमच्या यंत्रावर झाली. अमरोलीसह सौराष्ट्रचा बहुतांश भाग हा भूकंपीय क्षेत्र ३ अंतर्गत येतो. धोक्याच्या दृष्टीने हा भाग मध्यम धोक्याच्या श्रेणीत आहे. अमरेलीमध्ये फॉल्ट लाइन १० किमीपर्यंत आहे. तर शक्तिशाली भूकंपासाठी ही लाइन ६० ते ७० किमी असते. अमरेलीमध्ये सर्वाधिक ४.४ तीव्रतेचा भूकंप १३० वर्षांपूर्वी १८९१ मध्ये आला आहोत. तर सौराष्ट्र क्षेत्रातील सर्वात मोठा भूकंप हा जुनागडमध्ये २०११ मध्ये आला होता.

 या महिन्यामध्ये २३ फेब्रुवारीपासून ४८ तासांमध्ये अमरेलीच्या सावरकुंडला आणि खंबा तालुक्यामध्ये ३.१ ते ३.४ तीव्रतेचे भूकंपाचे चार धक्के नोंदवले गेले. त्यामुळे येथील रहिवासी चिंतीत आहेत. गुजरातमधील कच्छमध्ये २००१ मध्ये आलेल्या भूकंपामध्ये १९ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला होता. तर १.६७ लाख लोक जखमी झाले होते.  

टॅग्स :EarthquakeभूकंपGujaratगुजरात