शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

Earthquakes: दोन वर्षांत ४०० भूकंपाचे धक्के, भारतातील या ठिकाणी राहणं झालंय भयावह, भूगर्भात चाललंय तरी काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 14:38 IST

Earthquakes: गुजरातमधील अमरेली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये येथे तब्बल ४०० भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे.

गुजरातमधील अमरेली जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये येथे तब्बल ४०० भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. भूकंपशास्त्राच्या भाषेत या प्रकाराला भूकंप स्वार्म म्हटलं जातं. स्वार्म म्हणजे भूकंपाच्या कमी तीव्रतेच्या धक्क्यांची मालिका असते. हे धक्के कमी वेळासाठी जाणवतात. मात्र ते अनेक दिवसांपर्यंत जाणवत असतात. अमरेली जिल्ह्यामध्ये असलेल्या मिटियाला गावातील ग्रामस्थांनी या भूकंपाच्या धक्क्यांचा एवढा धसका घेतला आहे की, आता ते खबरदारी म्हणून घराबाबेर झोपू लागले आहेत.

मिटियालामधील ग्रामस्थ मोहम्मद राठोड याने सांगितले की, या धक्क्यांच्या भीतीमुळे सरपंचांसह गावातील बहुतांश लोकांनी रात्री घराबाहेर झोपण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, गांधीनगर येथील भूकंप संशोधन संस्थेचे महासंचालक सुमेर चोप्रा यांनी सांगितले की, या भूकंपीय हालचालींचं कारण टेक्टॉनिक क्रम आणि जलीय भार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, गेली दोन वर्षे आणि दोन महिन्यांच्यादरम्यान, अमरेलीमध्ये ४०० सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामधील ८६ टक्के भूकंपांची तीव्रता ही दोनपेक्षा कमी होती. तर १३ टक्के भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ही दोन ते तीनच्या दरम्यान होती. केवळ पाच धक्क्यांची तीव्रता ही ३ पेक्षा अधिक होती. 

त्यांनी सांगितले की, बहुतांश भूकंपाचे धक्के हे लोकांना जाणवले नाहीत. तर त्यांची नोंद ही आमच्या यंत्रावर झाली. अमरोलीसह सौराष्ट्रचा बहुतांश भाग हा भूकंपीय क्षेत्र ३ अंतर्गत येतो. धोक्याच्या दृष्टीने हा भाग मध्यम धोक्याच्या श्रेणीत आहे. अमरेलीमध्ये फॉल्ट लाइन १० किमीपर्यंत आहे. तर शक्तिशाली भूकंपासाठी ही लाइन ६० ते ७० किमी असते. अमरेलीमध्ये सर्वाधिक ४.४ तीव्रतेचा भूकंप १३० वर्षांपूर्वी १८९१ मध्ये आला आहोत. तर सौराष्ट्र क्षेत्रातील सर्वात मोठा भूकंप हा जुनागडमध्ये २०११ मध्ये आला होता.

 या महिन्यामध्ये २३ फेब्रुवारीपासून ४८ तासांमध्ये अमरेलीच्या सावरकुंडला आणि खंबा तालुक्यामध्ये ३.१ ते ३.४ तीव्रतेचे भूकंपाचे चार धक्के नोंदवले गेले. त्यामुळे येथील रहिवासी चिंतीत आहेत. गुजरातमधील कच्छमध्ये २००१ मध्ये आलेल्या भूकंपामध्ये १९ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला होता. तर १.६७ लाख लोक जखमी झाले होते.  

टॅग्स :EarthquakeभूकंपGujaratगुजरात