शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खळबळजनक! आई-वडिलांच्या मृतदेहाशेजारी सापडलं 4 दिवसांचं बाळ; 3 दिवसांपासून घर बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 10:17 IST

धक्कादायक बाब म्हणजे मृत दाम्पत्याचं 4-5 दिवसांचं बाळ जिवंत आढळून आलं. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही बाब उघडकीस आली.

उत्तराखंडमधील डेहरादूनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका घरातून पती-पत्नीचे मृतदेह सापडले आहेत. मृतदेह तीन दिवस जुने असल्याने ते कुजलेले होते. धक्कादायक बाब म्हणजे मृत दाम्पत्याचं 4-5 दिवसांचं बाळ जिवंत आढळून आलं. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने ही बाब उघडकीस आली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणाने कर्ज घेतलं होतं, ते फेडू न शकल्याने त्याने पत्नीसह आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

13 जून रोजी पोलीस कंट्रोल रुमला टर्नर रोडवरील एका घरातून खूप दुर्गंधी येत असल्याने आत मृतदेह असू शकतो अशी माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे प्रमुख आपल्या टीमसह टर्नर रोडवरील C13 घराजवळ पोहोचले. एक दरवाजा बाहेरून बंद होता तर दुसऱ्या दाराला आतून कडी लावली होती दरवाजा उघडला असता दोन मृतदेह जमिनीवर पडलेले दिसले. 

खोलीत 4-5 दिवसांचं बाळ सापडलं

पोलिसांच्या पथकाने घरामध्ये झडती घेतली असता खोलीत 4-5 दिवसांचं बाळ सापडलं. मुलगी जिवंत होती, पोलिसांनी तिला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवलं. पोलिसांनी एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण करून तपास केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतदेहांवर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले.

एक वर्षापूर्वी झालेलं लग्न 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह हे सहारनपूर जिल्ह्यातील नागल पोलीस स्टेशनच्या चहलोली भागातील 25 वर्षीय काशिफचा मुलगा मोहताशिम आणि त्याची पत्नी अनम (२२) यांचे आहेत. चार महिन्यांपूर्वीच तs या घरात राहायला आले होते. सोहेल असं घरमालकाचं नाव असून तो उत्तरकाशी येथील जोशीडा येथील रहिवासी आहे. मृताच्या कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावले असता काशिफचे दोनदा लग्न झाल्याचे समजले. पहिल्या लग्नापासून पाच वर्षांची मुलगी आहे. तर, वर्षभरापूर्वी त्याने अनम नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं.

पहिल्या पत्नीचे नाव नुसरत असून, माझा नवरा दोन-तीन दिवसांपासून फोन उचलत नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. माझे शेवटचे बोलणे 10 जून रोजी रात्री 11 वाजता होते. काशिफने उधार घेतलेले पाच लाख रुपये परत करायचे असल्याने उद्या गावी येणार असल्याचे सांगितले. दोन-तीन वेळा फोन आला नाही आणि नंतर फोन बंद झाला. मी येथे आले तेव्हा घराला कुलूप असल्याचे दिसले. त्यानंतर मी माझ्या सासऱ्यांना आणि भावाला याबद्दल सांगितले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड