शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
2
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
3
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
5
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
6
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
7
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
8
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
9
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
10
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
11
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
12
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
13
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
14
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
15
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
16
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
17
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
18
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
19
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
20
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
Daily Top 2Weekly Top 5

‘५जी’मुळे ‘दूरसंचार’चे महत्त्व आणखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 02:11 IST

‘५जी’च्या आगमनामुळे दूरसंचार क्षेत्राची इतर प्रमुख क्षेत्रांसोबतची ही जोडणी (कनेक्ट) आणखी मजबूत होईल, असे दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांनी सांगितले.

नवी दिल्ली : दूरसंचार क्षेत्राचा आर्थिक वृद्धी आणि रोजगार यावर थेट परिणाम होत असतो. त्याचबरोबर आरोग्य व कृषी यांसारख्या प्रमुख क्षेत्रांसाठी दूरसंचार क्षेत्र महत्त्वाचे आहे. ‘५जी’च्या आगमनामुळे दूरसंचार क्षेत्राची इतर प्रमुख क्षेत्रांसोबतची ही जोडणी (कनेक्ट) आणखी मजबूत होईल, असे दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांनी सोमवारी सांगितले.येथे ‘आसियान-ट्राय’ कार्यक्रमात अंशू प्रकाश म्हणाले की, नागरिकांचे सबलीकरण करणे, प्रशासन अधिक गतिमान करणे आणि पारदर्शकतेत वाढ करणे यात दूरसंचार क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे. हे एक प्रमुख पायाभूत क्षेत्र आहे. त्याचा आर्थिक वृद्धी व रोजगारावर थेट परिणाम होत असतो. कारण इतर क्षेत्रे दूरसंचार क्षेत्रावरच स्वार होऊन काम करीत असतात. वित्त, कृषी, आरोग्यसेवा आणि इतरही अनेक क्षेत्रांसाठी ‘डिजिटल कनेक्टिव्हिटी’ हा एक अविभाज्य भाग आहे. ‘५जी’च्या आगमनानंतर ही कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.दूरसंचार नियामक ‘ट्राय’चे चेअरमन आर. एस. शर्मा यांनी सांगितले की, माहिती व दळवळण तंत्रज्ञान क्षेत्रात यंत्रणा व डाटासुरक्षा अधिक महत्त्वाची होत चालली आहे. अलीकडच्या काळात प्रत्येक क्षेत्र दूरसंचार क्षेत्रावर अवलंबून आहे. या क्षेत्राची कमजोरी (व्हल्नरेबिलिटी) इतर क्षेत्रांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.