शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

जिल्हा बॅँकेस कर्जमाफीचे ३.८७ कोटी निर्णय: आघाडी सरकारच्या धोरणाची युतीच्या काळात अंमलबजावणी

By admin | Updated: February 20, 2016 00:44 IST

जळगाव : आघाडी सरकारच्या काळात कर्ज माफीबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी युती सरकारने करत जिल्हा बॅँकेस बलुतेदार संस्थांच्या कर्ज माफीचे ३ कोटी ८७ लाख रूपये मंजूर झाले आहेत. जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सहकार मंत्र्याशी या संदर्भात केलेल्या चर्चेनंतर केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर राज्यातील सर्व जिल्हा बॅँकांना हा निधी ...

जळगाव : आघाडी सरकारच्या काळात कर्ज माफीबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी युती सरकारने करत जिल्हा बॅँकेस बलुतेदार संस्थांच्या कर्ज माफीचे ३ कोटी ८७ लाख रूपये मंजूर झाले आहेत. जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सहकार मंत्र्याशी या संदर्भात केलेल्या चर्चेनंतर केवळ जळगाव जिल्हाच नव्हे तर राज्यातील सर्व जिल्हा बॅँकांना हा निधी मिळणार आहे. आघाडी सरकारच्या काळात २०१२ मध्ये शेतकर्‍यांना कर्ज माफीचा निर्णय घेण्यात आला होता. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करताना बॅँकांच्या त्यावेळी नाकेनऊ आले होते. केवळ कर्जमाफी होणार म्हणून अनेकांकडून कर्ज भरणेही बंद झाले होते. त्यामुळे जिल्हा बॅँका अडचणीत आल्या होत्या. मात्र नंतर शासनाकडून टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत गेले. मात्र बलुतेदार संस्थांचे माफ केलेले कर्ज अद्याप प्राप्त नव्हते. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या एनपीएही वाढलेला दिसत होता. सहकार मंत्र्यांकडे चर्चादरम्यान, याप्रश्नी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन याप्रश्नी चर्चा केली. सहकार सचिव सिंधू यावेळी उपस्थित होते. या चर्चेनंतर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व जिल्हा बॅँकांना बलुतेदार संस्थांच्या कर्ज माफीचे पैसे देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा बॅँकेस यामुळे ३ कोटी ८७ लाखाचा निधी मिळणार असल्याचे अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सांगितले. --------नोकर भरतीचा लवकरच निर्णय जिल्हा बॅँकेने ५०० कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव राज्याच्या सहकार विभागाला पाठविला होता. मात्र त्यावर अद्याप निर्णय न झाल्याने या बैठकीत पहिल्या टप्प्यात २०० कर्मचारी नियुक्तीची परवानगी मिळावी अशी विनंती करण्यात आली. त्यावरही सकारात्मक निर्णयाचे आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिले. येत्या कॅबिनेट मध्ये त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ----कोटबॅँकेचे संगणकीकरण आता आटोपत आले असून नवीन कर्मचारी वर्ग मिळाल्यास संगणक विषयातील तज्ज्ञांना शाखांवर देता येईल व बॅँकेच्या कामांना यामुळे गती मिळेल. -रोहिणी खडसे-खेवलकर, अध्यक्षा, जिल्हा बॅँक.