शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ 350 काश्मिरी पंडितांनी राज्यपालांकडे पाठवले सामूहिक राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 19:36 IST

Kashmiri Pandit : राहुल भट यांची गुरुवारी बडगाम जिल्ह्यातील एका सरकारी कार्यालयात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तेव्हापासून खोऱ्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

श्रीनगर : गुरुवारी 35 वर्षीय काश्मिरी पंडित राहुल भट यांच्या हत्येवरून जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात तणाव वाढला आहे. राहुल बट यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या 350 काश्मिरी पंडितांनी राज्यपालांकडे सामूहिक राजीनामे पाठवले आहेत. राहुल भट यांची गुरुवारी बडगाम जिल्ह्यातील एका सरकारी कार्यालयात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तेव्हापासून खोऱ्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. लष्कर-ए-तैयबा संघटनेशी संबंध असलेल्या काश्मीर टायगर्स या संघटनेने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी सुरू करण्यात आलेल्या रोजगार कार्यक्रमांतर्गत राहुल भट यांना नोकरी मिळाली होती. ते चाडूरा येथील तहसील कार्यालयात कार्यरत होते. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर राहुल भट यांना तात्काळ श्रीनगरच्या एसएमएचएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी रात्री काश्मिरी पंडितांनी जम्मू-श्रीनगर महामार्ग आणि बारामुल्ला-श्रीनगर महामार्ग रोखून राहुल भट यांच्या हत्येचा निषेध केला. यावेळी त्यांनी राहुल बट यांचा मृतदेह रस्त्यावर ठेवून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेचारच्या सुमारास लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी तहसील कार्यालयात घुसले. त्यानंतर दहशतवाद्यांनी राहुल भट यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. राहुल भट हे बडगाम जिल्ह्यातील विस्थापित वसाहतीत राहत होते आणि गेल्या आठ वर्षांपासून तेथे काम करत होते. राहुल भट यांच्या पश्चात पत्नी, त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आणि वडील असा परिवार आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरResignationराजीनामा