शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ 350 काश्मिरी पंडितांनी राज्यपालांकडे पाठवले सामूहिक राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 19:36 IST

Kashmiri Pandit : राहुल भट यांची गुरुवारी बडगाम जिल्ह्यातील एका सरकारी कार्यालयात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तेव्हापासून खोऱ्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

श्रीनगर : गुरुवारी 35 वर्षीय काश्मिरी पंडित राहुल भट यांच्या हत्येवरून जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात तणाव वाढला आहे. राहुल बट यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या 350 काश्मिरी पंडितांनी राज्यपालांकडे सामूहिक राजीनामे पाठवले आहेत. राहुल भट यांची गुरुवारी बडगाम जिल्ह्यातील एका सरकारी कार्यालयात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तेव्हापासून खोऱ्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. लष्कर-ए-तैयबा संघटनेशी संबंध असलेल्या काश्मीर टायगर्स या संघटनेने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी सुरू करण्यात आलेल्या रोजगार कार्यक्रमांतर्गत राहुल भट यांना नोकरी मिळाली होती. ते चाडूरा येथील तहसील कार्यालयात कार्यरत होते. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर राहुल भट यांना तात्काळ श्रीनगरच्या एसएमएचएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गुरुवारी रात्री काश्मिरी पंडितांनी जम्मू-श्रीनगर महामार्ग आणि बारामुल्ला-श्रीनगर महामार्ग रोखून राहुल भट यांच्या हत्येचा निषेध केला. यावेळी त्यांनी राहुल बट यांचा मृतदेह रस्त्यावर ठेवून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेचारच्या सुमारास लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी तहसील कार्यालयात घुसले. त्यानंतर दहशतवाद्यांनी राहुल भट यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. राहुल भट हे बडगाम जिल्ह्यातील विस्थापित वसाहतीत राहत होते आणि गेल्या आठ वर्षांपासून तेथे काम करत होते. राहुल भट यांच्या पश्चात पत्नी, त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आणि वडील असा परिवार आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरResignationराजीनामा