शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

३४ किलोमीटर्सच्या जमिनीचे अधिग्रहण पूर्ण

By admin | Updated: May 7, 2016 01:54 IST

यवतमाळ राज्यातला दुष्काळग्रस्त जिल्हा असून या भागात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारला जाणीव आहे. म्हणूनच महाराष्ट्रात वर्धा नांदेड व्हाया यवतमाळ लोहमार्ग

नवी दिल्ली : यवतमाळ राज्यातला दुष्काळग्रस्त जिल्हा असून या भागात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारला जाणीव आहे. म्हणूनच महाराष्ट्रात वर्धा नांदेड व्हाया यवतमाळ लोहमार्ग प्रकल्प, रेल्वे मंत्रालयाचा अग्रक्रम आहे. २८४ किलोमीटर्स अंतराच्या या लोहमार्गापैकी ३४ किलोमीटर्स अंतराचे भू संपादन पूर्ण झाले आहे, असे रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी खासदार विजय दर्डांच्या प्रश्नाला उत्तर देतांना राज्यसभेत स्पष्ट केले.राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात रेल्वेमंत्र्यांना उपप्रश्न विचारतांना खासदार दर्डा म्हणाले, प्रलंबित प्रकल्पांबाबत रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारांना त्यांचा अग्रक्रम विचारला आणि महाराष्ट्र सरकारबरोबर एक संयुक्त करार केला. या करारानुसार राज्य सरकारला १0 हजार कोटी रूपये रेल्वे मंत्रालयाकडून मिळणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. या निमित्ताने एका गंभीर विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो की वर्धा यवतमाळ नांदेड लोहमार्ग प्रकल्पाचे ११ फेब्रुवारी २00९ साली तत्कालिन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादवांनी भूमीपूजन केले.२0१६ पर्यंत त्याचे फक्त ३.१ टक्के काम झाले आहे. शेतकरी वर्गाच्या दृष्टिने विदर्भ आणि मराठवाडा अत्यंत संवेदनशील भाग आहे. या भागात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. प्रस्तुत प्रकल्पात भू संपादनाचा अडथळा असेल तर ज्या प्रकारे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी पुलाच्या आतील जमिनी संपादित करून त्याची नुकसान भरपाई दिली त्याच धर्तीवर या अत्यंत महत्वाच्या प्रलंबित प्रकल्पाचे कामही अग्रक्रमाने लवकरात लवकर आपण पूर्ण करावे, अशी माझी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर मी आपणास विचारू इच्छितो की हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी पूर्ण होईल? विदर्भ आणि मराठवाड्यावर कधी प्रभूकृपा होईल? प्रभू खरोखर प्रसन्न झाले तर सारी कामे सुरळीत पार पडतात, यावर माझा विश्वास आहे. रेल्वेमंत्र्यांनी या प्रश्नाला उपरोक्त उत्तर दिले.वर्धा-नांदेड लोहमार्ग प्रकल्पाची पार्श्वभूमी- संसदेत यंदाचा रेल्वे संकल्प मांडला जाण्यापूर्वी रेल्वे मंत्र्यांनी खासदारांकडून अग्रक्रम ठरवण्यासाठी पूर्वसुचना मागवल्या होत्या. त्याला अनुसरून खासदार विजय दर्डांनी वर्धा यवतमाळ नांदेड लोहमार्ग प्रकल्प कसा संथगतीने चालला आहे, यावर प्रकाशझोत टाकीत सुरेश प्रभूंना एक सविस्तर पत्र पाठवले. हा लोहमार्ग जेव्हा मंजूर झाला तेव्हा एकुण प्रकल्पाचा खर्च २७४ कोटी ५५ लाख रूपये होता. विलंब झाल्यामुळे आता हा खर्च १६00 पेक्षा अधिक कोटींवर गेला आहे. प्रकल्पासाठी केंद्र सरकार ६0 टक्के व राज्य सरकार ४0 टक्के रक्कम खर्च करणार आहे. २८४ किलोमीटर्सच्या या लोहमार्गातील १७0 किलोमीटर्सचे अंतर एकट्या यवतमाळ जिल्हयात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे हा जिल्हा अगोदरच संवेदनशील असून देशाच्या करूणेला पात्र ठरला आहे. तरीही या संयुक्त प्रकल्पात २00९ पासून आत्तापर्यंत फक्त १८४ कोटी रूपये खर्च झाले आहेत. याच गतीने या लोहमार्ग प्रकल्पाचे कामकाज सुरू राहिले तर हा लोहमार्ग तयार होण्यास आणखी १00 वर्षे लागतील अशी जाणीवही खा. दर्डांनी या पत्रात रेल्वेमंत्र्यांना करून दिली होती. राज्यसभेतील दर्डांच्या प्रश्नाची अशी पूर्वपिठीका आहे.