शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

CoronaVirus News: चिंता वाढली! सहा महिन्यांत तीनपैकी एका कोरोनामुक्तास भेडसावू लागते 'ही' गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 07:48 IST

CoronaVirus News: लॅन्सेट अहवालातील माहिती; २ लाख ३० हजारांहून अधिक जणांच्या आरोग्याच्या घेतल्या नोंदी

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. काेराेनामुक्तांच्या सर्वेक्षणानंतर धक्कादायक माहिती समाेर आली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर सहा महिन्यांत तीनपैकी एकाला मेंदूविकाराशी निगडित (न्यूरॉलॉजिकल) किंवा मानसिक समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे.कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या न्यूरॉलॉजिकल आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास या सर्वेक्षणातून करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर लॅन्सेट सायकायट्री जर्नलमध्ये याबाबत अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, कोरोनामुक्त झालेल्या २ लाख ३० हजारांहून अधिक लोकांच्या आरोग्याच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यापैकी ३४ टक्के लोकांना सहा महिन्यांत मेंदूविकाराशी निगडित न्यूरॉलॉजिकल किंवा मानसिक समस्यांनी ग्रासले होते. १७ टक्के लोक अत्यंत चिंताग्रस्त, तर १४ टक्के लोकांमध्ये मूड डिसऑर्डरबाबतची लक्षणे आढळून आली. मनोविकाराशी कोरोनाचा काय संबंध आहे याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती मिळालेली नाही; पण कोरोनामुक्त झालेल्या लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य या दोन गोष्टी प्रामुख्याने आढळून आल्या, असे निरीक्षण संशोधकांनी नाेंदवले.या सर्वांमध्ये स्ट्रोक, स्मृतिभ्रंश, न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरसारखी लक्षणेही आढळली; पण या लक्षणांचे प्रमाण कमी आहे.  साधारणतः तीनपैकी एका कोरोनामुक्त व्यक्तीत असे आजार उद्भवत असल्याचे दिसून आले आहे.मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. आस्था दासानी यांनी सांगितले की, मुंबईतही अशा स्वरूपाच्या तक्रारी असणाऱ्या काही नोंदी आहेत. मुख्यतः मेंदूतील न्यूरो केमिकल्स कोरोनाची लागण झाल्यावर बदलतात, त्यामुळे मेंदूविकाराचा धोका अधिक जाणवतो. त्याचप्रमाणे, काही ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीवर याचा खोलवर परिणाम झालेला असून यामुळे वागणुकीतही बदल दिसून येत असल्याचे रुग्णांच्या कुटुंबीयांनी सांगितले.मानसिक समस्यांचे प्रमाणही चिंताजनककोविडचा संसर्ग झाल्यानंतर किंवा पोस्ट कोविडच्या फेझमध्येही रुग्णांमध्ये मानसिक समस्यांचे प्रमाण वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. बऱ्याचदा कोविडशी निगडित शारीरिक व्याधींवर उपचार केले जातात, त्यासाठी रुग्ण किंवा नातेवाईक आग्रही असतात. परंतु, मानसिक समस्यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. याविषयी, जनजागृतीचा अभाव असल्यानेही अनेकदा रुग्ण पुढाकार घेत नाहीत. मात्र यात कोणताही कमीपणा नसून हे उपचार किंवा मानसिक समस्यांच्या मुक्तीकडे टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. अशा समस्या भेडसावत असल्यास रुग्ण किंवा कुटुंबीयांनी पुढाकार घ्यावा.                      - डॉ. मालिनी अग्रवाल, मानसोपचारतज्ज्ञ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या