शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Corona Update: चिंताजनक! मणिपूरच्या चंदेलमध्ये कोरोना रुग्णांची वाढ 325%; महाराष्ट्रातील दोन जिल्हे धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 22:04 IST

Corona Virus patient increasing again: रुग्णसंख्या जरी कमी असली तरी रुग्ण वेगाने वाढू लागल्याने सरकारची चिंता वाढली आहे. दुसरीकडे देशातील रुग्णदेखील वाढू लागले आहेत. 

देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona Patient) पुन्हा वाढ होऊ लागली असून काही जिल्ह्यांची परिस्थिती पुन्हा धोकादायक बनली आहे. एक असा जिल्हा आहे जिथे 50 किंवा 100 टक्के नाही तर 325 टक्क्यांनी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ 28 जून ते 27 जुलै या एका महिन्यातील आहे. (corona Patient increasing in Maharashtra two district Beed, Solapur)

हा जिल्हा मणिपूर (Manipur) राज्यातील चंदेल हा आहे. चंदेलमध्ये गेल्या चार आठवड्यांपैकी 28 जून ते 4 जुलै पर्यंतच्या पहिल्या आठवड्यात फक्त 8 रुग्ण सापडले होते. मात्र, ही संख्या वाढत गेली आणि 19 जुलै ते 25 जुलै दरम्यान तिथे 34 रुग्ण सापडले आहेत. रुग्णसंख्या जरी कमी असली तरी रुग्ण वेगाने वाढू लागल्याने सरकारची चिंता वाढली आहे. दुसरीकडे देशातील रुग्णदेखील वाढू लागले आहेत. 

कोरोनाची दुसरी लाट संपत असल्याची चिन्हे गेल्या काही काळापासून दिसत होती. मात्र, राज्यांनी लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल केल्याने रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्याप कोरोना गेलेला नाही, कोरोनाचे नियम पाळा असा सल्ला दिला आहे. तर अनेक तज्ज्ञांनी लॉकडाऊनचे निर्बंध हटविणे धोक्याचे ठरू शकते असा इशारा दिला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशातील 22 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची चिंताजनक परिस्थिती आहे. यापैकी 13 जिल्हे हे पूर्वोत्तर राज्यांपैकी आहेत. यामध्ये मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि आसाम आहे. तर उर्वरित 7 जिल्हे केरळ आणि 2 महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील बीड आणि सोलापूर हे दोन जिल्हे चिंता वाढवत आहेत. (Corona Virus in Maharashtra.)

एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, पूर्वोत्तर लोकांमध्ये कमी अँटीबॉडी विकसित झाली होती. यामुळे तिथे रुग्ण वाढ लागले आहेत. आयसीएमआरने केलेल्या सिरो सर्व्हेमध्ये आसाममध्ये 50 टक्के सिरो प्रसार आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांमध्ये बीड आणि सोलापर जिल्ह्यांत अनुक्रमे 28 आणि 33 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस