शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्रासह ३२ राज्यांनी नाही दिला स्मार्ट सिटीचा निधी

By admin | Updated: March 31, 2017 01:12 IST

देशभरातील १०० स्मार्ट सिटीसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेत राज्य सरकारांचे स्वारस्य कमी होत

नितीन अग्रवाल/ नवी दिल्ली देशभरातील १०० स्मार्ट सिटीसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेत राज्य सरकारांचे स्वारस्य कमी होत असल्याचे दिसून येत आहे. भलेही केंद्र सरकार या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा दुर्लक्षितपणा असल्याचा इन्कार करीत आहे; पण वस्तुस्थिती ही आहे की, महाराष्ट्रासह १८ राज्यांनी ३२ स्मार्ट शहरांसाठी आपल्या वाट्याची रक्कमच दिलेली नाही. विशेष म्हणजे यात अनेक भाजपशासित राज्यांचा समावेश आहे. शहरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आतापर्यंत निवडण्यात आलेल्या ४० शहरांपैकी ३२ शहरांसाठी राज्य सरकारच्या वतीने आपल्या वाट्याचा निधी दिलेला नाही. आपल्या वाट्याचा निधी न देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पंजाब, छत्तीसगढ, गुजरात, हरियाणा, राजस्थान, झारखंड, हिमाचल, तेलंगणा, त्रिपुरा, केरळ, बिहार, आसाम आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. दिल्ली, चंदीगड आणि अंदमान-निकोबार बेट समूह यासारख्या केंद्रशासित प्रदेशांनीही आपल्या वाट्याचा निधी दिला नाही. शिवसेनेचे सदस्य राहुल शेवाळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्र्यांनी आज सांगितले की, सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणालीनुसार (पीएफएमएस) राज्यांच्या वाट्याच्या निधीबाबत निगराणी केली जाते. ही योजना संथ चालू असल्याच्या प्रश्नाबाबतही त्यांनी नकार दिला. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, ३१ मार्च रोजी तिसऱ्या टप्प्यातील स्मार्ट शहरांचे प्रस्ताव दिले जातील. याच्या मूल्यांकनासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल. केंद्र आणि राज्य सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक स्मार्ट शहरासाठी पाच वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी सुमारे १०० कोटी रुपये देण्याची तरतूद आहे. उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार आहे.‘त्या’ राज्यांनी नाही दिला वाटाज्या राज्यांनी आपल्या वाट्याचा निधी दिला नाही त्यात बहुतांश भाजपशासित राज्ये आहेत. यात महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, झारखंड, गुजरात आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे.